शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

अंधश्रद्धेतून सर्वांनी बाहेर पडले पाहिजे

By admin | Updated: August 12, 2015 23:37 IST

वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पण आपल्या भाषेचा अभिमान असणे गरजेचे. जाती, धर्म, लिंगभेद करणे चुकीचे आहे.

अलिबाग : वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पण आपल्या भाषेचा अभिमान असणे गरजेचे. जाती, धर्म, लिंगभेद करणे चुकीचे आहे. जात नाही ती जात. या अंधश्रद्धेतून, रूढी, परंपरांतून आपण सर्वांनी बाहेर पडले पाहिजे आणि हा बदल फक्त तरु ण पिढी करू शकते, असा विश्वास वसुधा पाटील ऊर्फ मराठीतील कवयित्री व कथालेखिका नीरजा यांनी व्यक्त केला आहे.मंगळवारी पीएनपी महाविद्यालयाच्या १३ व्या वर्धापनदिनी पीएनपी संकुलात आयोजित कार्यक्र मात नीरजा प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाची दारे उघडली आहेत, स्त्री सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. बहुतेक स्त्रीविषयी सदर जास्तीत जास्त त्यांच्याकडून लिहिले गेले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. मी शहाबाज येथील साहित्यिक व समीक्षक म. सु. पाटील यांची कन्या. आजवर अनेक ठिकाणी कार्यक्र मासाठी आमंत्रित केले गेले. पण आपल्या मातीतला हा माझा सत्कार मी कधीही विसरणार नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.उपप्राचार्य संजीवनी नाईक म्हणाल्या, शिक्षण फक्त डिग्रीसाठी नको. शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचा आहे. पीएनपी महाविद्यालय २००३ मध्ये ५३ विद्यार्थ्यांपासून सुरू झाले. आता महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही एक तपाची साधना आहे. यामध्ये संस्थाचालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, प्रा. डॉ. ओमकार पोटे, प्रा. डॉ. प्रगती पाटील, प्रा. सानिका बाम, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. विक्र ांत वार्डे आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)