शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:58 IST

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील

मुरुड जंजिरा : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील शेतक-याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी शेतकºयाच्या प्रलंबित प्रश्नी मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन वारस नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.नांदगाव येथील सर्व्हे क्र. २४,गट क्र. ३९३ या मिळकतीचे मूळ मालक रामा नागू पाटील ऊर्फ माळी यांच्या वारसाची नोंद नसल्याने आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या वतीने कोकण आयुक्त कोकणभवन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी, मुरु ड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.कोकण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून वंचित असलेल्या शेतकºयाची वारस नोंदी करण्याबाबत कळविण्यात आले होते.कोकण आयुक्तांनी मंडळ अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यालाही जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्याप वारस नोंद झालेली नाही.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी अध्यक्ष राजाराम पाटील व शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी नुकतीच मंडळ अधिकारी नारायण गोयजी यांची भेट घेतली. मयत शेतकºयाच्या वारसनोंद कामी पंचनामा, जबाब घेण्यात आला. यावेळी दत्ता माळी, रामा माळी, काशिनाथ माळी, सागर माळी, राजा माळी व गावपंच कमिटी सदस्य उपस्थित होते.