शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:58 IST

Raigad News : सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. 

- आविष्कार देसाईरायगड - सरकारी नाेकरीकडे डाेळे लावून बसलेल्या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीवरील तब्बल ५० उमेदवारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील यांनी या नियुक्त्यांच्या फायलीवर स्वाक्षऱ्या करून ऐन दिवाळीच्या ताेंडावर उमेदवारांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना अतिशय कष्टमय जीवन जगावे लागले आहे. कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र, त्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील फायली वर्षानुवर्षे गठ्ठ्यात दबल्या गेल्या हाेत्या. त्या आता बाहेर काढून मृतांच्या वारसांना न्याय देण्याचे काम डाॅ.पाटील यांनी केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषदेकडे एकूण ७९ अर्ज आले हाेते. पैकी ५० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आराेग्यसेवक पुरुष-११, ग्रामसेवक-१०, परिचर-९, शिक्षक-५, पर्यवेक्षिका-३, स्त्री परिचर-३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-२, वरिष्ठ सहायक लिपिक-२, कनिष्ठ अभियंता बांधकाम-२, कनिष्ठ सहायक लेखा-२, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा)-१, औषध निर्माण अधिकारी-१ यांचा समावेश आहे. वेळाेवेळी निर्गमित झालेल्या सरकारी निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.सरकारच्या याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. दीर्घ कालावधीपासून अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा प्रश्न प्रलंबित हाेता. मृतांच्या वारसांना वेळेवर त्यांचा हक्क मिळणे गरजेचे हाेते. यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले.- डाॅ. किरण पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद 

सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना शिक्षण पूर्र्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळतेच असे नाही. कोरोना परिस्थितीत तर अनेकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील वारसांना आता नोकरी मिळणारआहे. 

टॅग्स :jobनोकरीRaigadरायगड