शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

योजनांच्या अंमलबजावणीनंतर बदलांचे मूल्यमापनही आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:52 IST

जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांकडून होत असते.

अलिबाग : जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांकडून होत असते. मात्र, विकास योजनांच्या अंमलबजावणीनंतर मागास घटकांच्या जीवनमानात झालेल्या बदलांचे मूल्यमापन करण्यात यावे, असे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आ. विजय कांबळे यांनी मंगळवारी येथे दिलेआहेत.राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने रायगड जिल्ह्यास भेट देऊन अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भात विविध बाबींचा आढावा घेतला. रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात आयोगाने आढावा बैठक घेतली. आयोगाचे अध्यक्ष कांबळे यांनी आढावा घेतला. या वेळी आयोगाचे अन्य सदस्य मधुकर गायकवाड व संपर्क अधिकारी रमेश शिंदे उपस्थित होते.जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, महसूल प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस प्रशासनातर्फे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील,उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा विशेष उपक्र म असलेल्या ‘कातकरी बोलीभाषा’ पुस्तिकेचे आयोगाने विशेष कौतुक केले. त्यानंतर आयोगाने जिल्हा परिषद आस्थापनांवरील अनुसूचित जाती जमातींची रिक्त पदे, त्या पदभरतीसाठीचे प्रयत्न, पदोन्नती, बदल्यांमुळे रिक्त राहणारी पदे आदींबाबत आढावा घेतला. रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी सूचनाही कांबळे यांनी केली.आयोगाने जिल्हा दक्षता समिती, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्हे व प्रकरणे आदींचा आढावा घेतला. या वेळी आयोगाने सूचना केली की, गावागावात सामाजिक संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने कारणमीमांसा करून उपाययोजना करावी. दाखल प्रकरणांमध्ये दोषींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपासी अंमलदारांना प्रशिक्षित करावे, असेही आदेश आयोगाचे अध्यक्ष कांबळे यांनी दिले.निधी खर्चाचे नियोजन व्हावेअधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या खर्चात योजनानिहाय प्रयोजनात पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच निधी वेळेत खर्च होण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरून योजनेचा योग्य लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Raigadरायगड