शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या हॉल तिकिटात त्रुटी, विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:52 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.वास्तविक हॉल तिकिटांमधील चुका महाविद्यालयांनीच सुधारणे आवश्यक असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयसीएल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला असून, महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बोर्डाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार हॉल तिकिटावरील दुरुस्तींविषयी प्री लिस्ट कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आली होती, तरीसुद्धा त्यामध्ये बदल न केल्याने चुका आढळून येत आहेत. शाळा, महाविद्यालयाकडून झालेल्या चुकांमधील दुरुस्तीकरिता संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या वतीने दुरुस्ती संदर्भात बोर्डाला अर्ज सादर करणे आवश्यक असून, त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून दुरुस्तीच्या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे, आवश्यक असल्याची माहिती बोर्डाने दिली.पालकांनी याविषयी महाविद्यायाच्या निष्काळजीपणावर टीका केली असून, विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा? बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यामध्ये कोणतीही रिस्क घेण्यास विद्यार्थी तयार नसतात. अशा वेळी हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता मात्र विद्यार्थ्यांना तासन्तास उभे राहावे लागत असून, महत्त्वाचा वेळ वाया जात असल्याची प्रतिक्रिया पालक रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली. ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी आढळल्याने विद्यार्थ्यांना गोंधळ उडाला आहे. फोटो, नाव, विषय, लिंग, माध्यम यामध्ये साम्यता नसल्याने अभ्यासाची तयारी सोडून त्रुटी निस्तारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकरणी कॉलेज विभागीय मंडळाला, तर विभागीय मंडळ विद्यार्थी व कॉलेजला दोषी ठरवत असल्याचे चित्र दिसून येते.महाविद्यालयांकडून लूटहॉल तिकिटावरील बदलांकरिता विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालयांची चूक असल्याने १०० रुपये शुल्क जमा करण्याची जबाबदारी सर्वस्वी महाविद्यालयांवर असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी, तसेच पालकांची लूट केली जात असून एका बदलासाठी ३०० रुपये दर आकारले जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आमची चूक नसतानाही आम्ही अतिरिक्त शुल्क का भरावे? असा संताप अपर्णा मोरे या विद्यार्थिनीने व्यक्त केला आहे. हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता महाविद्यालयात अर्ज करण्यासाठी भली मोठी रांग आहे आणि यात पूर्ण दिवस वाया जात असून, गेले दोन दिवस मी कॉलेजला खेटा मारत असल्याचेही अपर्णाने स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी स्वत:च आॅनलाइन पद्धतीने फॉर्म भरले असून, यामध्ये मंडळाची काही चूक नाही. महाविद्यालयांनी कव्हरिंग लेटरसह अर्ज आणि हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून मंडळाला सादर करणे आवश्यक आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. मात्र, मंडळाकडे दुरुस्तीची नोंद केली जाईल. महाविद्यालयांना पूर्व यादी पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बदल न केल्याने हा गोंधळ उडाला आहे. याकरिता महाविद्यालयाने १०० रुपये अतिरिक्त शुल्क जमा करणे आवश्यक आहे.- डॉ. सुभाष बोरसे,सचिव, शिक्षण मंडळ, मुंबई

टॅग्स :examपरीक्षाNavi Mumbaiनवी मुंबई