शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

पेण : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान या ग्रामपंचायतीसाठी होणार असून बुधवारी २३ जानेवारीपासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यभरातील सहा प्रशासकीय विभागातील कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणाºया आहेत. पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने राजकीय रणांगण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २५ जानेवारीला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, निवडणूक उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख ४ ते ९ फेब्रुवारी २०१९ या दिवसात सकाळी १० ते दु. ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाननी संपेपर्यंत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दु. ३ वाजल्यानंतर होईल. मतदान २४ फेब्रुवारी रोजी रविवार सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होईल.पेणमधील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकानिवडणूक होणाºया राज्याच्या प्रशासकीय सहा विभागातील कोकणातील सर्वाधिक १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वाधिक रायगडमधील ९० ग्रामपंचायत, रत्नागिरी ४० तर सिंधुदुर्ग १ अशाप्रकारे सहभाग आहे. पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतीमध्ये २४ फेब्रुवारी रोजी मतदान होत असल्याने पेण अंतोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे.जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आहे.