शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

पेण : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान या ग्रामपंचायतीसाठी होणार असून बुधवारी २३ जानेवारीपासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यभरातील सहा प्रशासकीय विभागातील कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणाºया आहेत. पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने राजकीय रणांगण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २५ जानेवारीला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, निवडणूक उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख ४ ते ९ फेब्रुवारी २०१९ या दिवसात सकाळी १० ते दु. ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाननी संपेपर्यंत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दु. ३ वाजल्यानंतर होईल. मतदान २४ फेब्रुवारी रोजी रविवार सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होईल.पेणमधील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकानिवडणूक होणाºया राज्याच्या प्रशासकीय सहा विभागातील कोकणातील सर्वाधिक १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वाधिक रायगडमधील ९० ग्रामपंचायत, रत्नागिरी ४० तर सिंधुदुर्ग १ अशाप्रकारे सहभाग आहे. पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतीमध्ये २४ फेब्रुवारी रोजी मतदान होत असल्याने पेण अंतोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे.जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आहे.