शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक परवड थांबणार

By admin | Updated: December 16, 2015 00:57 IST

स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना

- आविष्कार देसाई,  अलिबागस्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रे देण्यात येणार असल्याने त्यांच्या कुटुंबांचे स्थलांतर झाले, तरी त्यांना आता राज्यभरातील शिक्षणाची कवाडे खुलीच राहणार आहेत.सर्वांना मोफत शिक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारवर आहे. गरीब, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी, वीटभट्ट्यांवर काम करणारी स्थलांतरित कुटुंबे मोठ्या संख्येने असल्याने त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. शिक्षणाचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला जात होता. यावर उपाययोजना म्हणून सरकारने आॅगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वेक्षण केले. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एक हजार १५० विद्यार्थ्यांना कुटुंबाच्या व्यवसायामुळे स्थलांतरित राहावे लागत असल्याचे समोर आले होते. अशा स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. रायगड जिल्ह्यात १८ हंगामी निवासी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली असून नोव्हेंबरपासून १२ हंगामी वसतिगृहे सुरुही करण्यात आली आहेत. त्यामध्ये सुधागड तालुक्यात चार आणि महाड तालुक्यातील आठ हंगामी वसतिगृहांचा समावेश आहे. त्यामध्ये १९९ मुले आणि १९७ मुली असे एकूण ३९६ विद्यार्थी पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले.एका विद्यार्थ्यामागे सरकार एक हजार ३६७ रुपये खर्च करणार आहे. त्यामध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण, चहा-नाष्टा, तेल, साबण, टुथपेस्ट अशा गरजेच्या वस्तू देणार असल्याचेही बडे यांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी रात्री नातेवाइकांकडे राहणार आहेत त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हंगामी निवासी वसतिगृहात राहायचे असेल, त्यांच्या राहण्याची व्यवस्था वसतिगृहात करण्यात येणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत हंगामी वसतिगृह सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.