शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जनआरोग्य योजनेतील लाभार्थींना ई-कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:29 IST

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला कर्जतमध्ये सोमवारी सुरुवात झाली.

कर्जत : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला कर्जतमध्ये सोमवारी सुरुवात झाली. योजनेचे राष्ट्रीय पातळीवर रांची येथे उद्घाटन होत असताना रायगड जिल्ह्याचा उद्घाटन सोहळा कर्जत येथील कृषी संशोधन केंद्रात पार पडला. दरम्यान, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यातील एकूण १ लाख ४० हजार लाभार्थींपैकी प्रायोगिक तत्त्वावर ८ लाभार्थींना ई-कार्ड वाटप केले.कर्जत येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील केंद्रात जिल्हास्तरीय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्यासह सिडको महामंडळाचे माजी संचालक वसंत भोईर, कर्जतच्या नगराध्यक्ष रजनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी प्रास्ताविकात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती करून दिली. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ग्रामीण भागात १ लाख २० हजार ४८९ लाभार्थींचा समावेश असून नगरपालिका हद्दीत या योजनेत २० हजार ६२० लाभार्थींचा समावेश आहे. जिल्हास्तरीय जन आरोग्य योजनेचे उद्घाटन झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील जन आरोग्य योजनेबद्दल लाभार्थी असलेल्या आठ लाभार्थींना ई-कार्ड यांचे वाटप करण्यात आले. त्यात हेमलता हरिचंद्र माळवी, वंदना गोविंद गिरी, दत्ताराम धर्मा म्हात्रे, रेखा कृष्णा घोसाळकर, हुसना बंबीवले, रवी गुरु नाथ पवार, विवेक हरिचंद्र माळवी, कुसुम मारु ती गिरी यांना वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका,आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, आशासेविका,अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरीय जन आरोग्य योजनेच्या उद्घाटन सोहळ्याआधी घेण्यात आले.जन आरोग्य योजनेतून देशातील १० लाख कोटी कुटुंबांना आरोग्य कवच मिळाले आहे. त्याआधी बँकांशी काही संबंध नसलेल्या सर्व व्यक्तींना जनधन योजनेअंतर्गत बँकेशी जोडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्र माला तालुक्याचे तहसीलदार अविनाश कोष्टी, तालुका गटविकास अधिकारी बाबाजी पुरी, आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री रवींद्र चव्हाण कर्जतला लोकलने आले आणि त्यानंतर वेणगाव येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कार्यक्र म स्थळी आले. कार्यक्र म झाल्यावर त्यांनी पळसदरी येथे जाऊन श्री स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शन घेतले आणि ट्रेननेच डोंबिवलीला प्रस्थान केले.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत