शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

महामार्गावर धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:22 IST

जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. ही धूळ वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्याचा त्यांना त्रास होत आहे.

राबगाव/पाली : पाली- वाकण पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. येथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा पसरत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांना त्रास होत आहे.मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून माती बसण्यासाठी पाणीदेखील टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. ही धूळ वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे या महामार्ग रुंदीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोप अनेक जण करत आहेत. यामुळे श्वसनाचाही त्रास होत असून, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाचे सुरू असलेले काम, खड्डे आणि धूळ यामुळे चालक व प्रवाशांसह महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीदेखील हैराण झाले आहेत.या मार्गावर प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे अनेकदा समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.- सचिन जाधव , वाहनचालक

टॅग्स :Raigadरायगड