शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:53 IST

नदी, नाले, ओढे दुथडी भरून : शेतात पाणी साचल्याने उत्पन्नात वाढ होण्याची बळीराजाला अपेक्षा

रोहा : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रोहा तालुक्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लावणीची खोळंबलेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत. दमदार पाऊस बरसू लागल्याने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून शेतात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणी साठू लागले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्न येण्याची अपेक्षा बळीराजाला आहे.

पावसाळी हंगामात भात लावणीसाठी मुबलक पाणी मिळाले तर भाताचे पीक चांगले येते. यंदा पावसाचे प्रमाण व एकंदरच परिस्थिती अनुकूल असल्याने चांगले पीक येण्याची शक्यता शेतकरीवर्गातून होत आहे. यंदा मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त कमी होते, त्यामुळे शेतीच्या मशागतीची व पावसाळी भात लागवड करायची राबांची तयारी यासाठी शेतकरीवर्गाला पुरेसा अवधी मिळाला, तर रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावरच पेरणीची कामे पूर्ण करण्यात आली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मोसमी पावसाने सुरुवात केल्याने पेरलेले राब वर आल्याने आता भाताची रोपे लागवडी योग्य झाली आहेत, त्यामुळे सध्या तालुक्यात ठिकठिकाणी बळीराजा भात लागवडीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. भातशेती लागवड करीत असताना इतर घटकांचे भाव गगनाला भिडले असल्याने भातशेती पिकविणे परवडत नाही. अशा स्थितीत शेतकरीवर्ग इतर मजूर न घेता घरच्या घरी कामे करून जास्तीत जास्त आर्थिक बचत कशी होईल, हीच विचारसरणी अमलात आणून कामे करताना दिसत आहेत.

यंदा पाऊस चांगला झाला असल्याने भातशेती लागवडीसाठी एकंदरच परिस्थिती पूरक आहे. लावणीसाठी शेतात पाणीही आहे. त्यामुळे रोहा विभागातील शेतकरी लावणीत मग्न आहेत. यंदा चांगले पीक पदरात पडेल आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळेल, अशी आशा आहे.- नंदकुमार मरवडे, शेतकरी, चिल्हे रोहा

टॅग्स :Raigadरायगड