शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:15 IST

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावते. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेल या कोरड्या पडतात. यावर मात करण्यासाठी परिणामकारक ठरणारे वनराई बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. १५ तालुक्यांत तीन हजार २४७ ठिकाणी बांधलेल्या वनराई बंधाºयांच्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. यासाठी एक कोटी २६ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर ४२ हजार ७० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.तापमानामध्ये सातत्याने उष्णता वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशांपर्यंत गेले होते. उष्णता प्रखर असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते, यासाठी प्रशासनामार्फत वनराई बंधारे बांधले जातात.पावसाळा संपल्यानंतर साधारणत: आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसेच बंधारे बांधण्यासाठी स्थानिक नागरिक श्रमदानातून हे बंधारे बांधतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले यांचे पाणी अडवले जाते.पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाळा संपल्यावरच ते बांधण्यावर भर दिला जातो. हे बंधारे फक्त वर्षभरासाठीच टिकतात. पुढच्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुटतात. त्यानंतर ते पुन्हा पावसानंतर उभारले जातात, ही प्रक्रिया सुरूच राहते. कमी खर्चात आणि श्रमदानातून केलेल्या या योजनेचा फायदा पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी होतो.याच पाण्यावर रब्बी हंगामातील भाजीपाला शेती, तसेच तृण धान्य पीकलागवड केली जाते. त्याचप्रमाणे याच पाण्याचा उपयोग कुटीरोद्योग म्हणजे वीटभट्टी, मत्स्य बीज यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येता. घरगुती वापराबरोबरच पशुधन आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठीही होत आहे.>वनराई बंधारे हे आकाराने छोटे-छोटे दिसत असले, तरी त्यांचा सकात्मक आणि परिणामकारक उपयोग होतो. यासाठीच वनराई बंधारे बांधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. २०१७-१८ या कालावधीत तीन हजार २४७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.>जिल्ह्यात बांधण्यात आलेले वनराई बंधारे (२०१७-१८)तालुका बांधलेले बंधारे जलसाठा (लीटर) मनुष्यबळ एकूण खर्चरोहा ३१९ १४,३५,५०,००० ४७८५ १७,५४,५००पनवेल ३१२ १४,०४,००,००० ४६८० १७,१६,०००माणगाव ४१२ १८,५४,००,००० ३८५० १५,६७,०००खालापूर २४३ १०,९३,५०,००० ३६४५ १३,३६,५००पोलादपूर २३२ १०,४४,००,००० ३३९० १२,४९,०००महाड २९० १३,०५,००,००० ३२१९ १२,५३,०००अलिबाग २६० ११,७०,००,००० ३१५० ९,४५,०००म्हसळा १८६ ८,३७,००,००० २६७० ९,८७,०००सुधागड १७३ ७,७८,५०,००० २४६० ९,११,०००तळा १५६ ७,०२,००,००० २३४० ८,५८,०००पेण १५३ ६,८८,५०,००० १९०५ ७,२४,५००मुरुड १५२ ६,८४,००,००० १९०५ ७,२३,५००कर्जत १७५ ७,८७,५०,००० १६५० ६,७०,०००श्रीवर्धन ११७ ५,२६,५०,००० १४५५ ५,५३,५००उरण ६७ ३,०१,५०,००० ९७५ ३,५९,५००एकूण ३२४७ १,४६,११,५०,००० ४२,०७० १,२६,२१,०००