शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:15 IST

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावते. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेल या कोरड्या पडतात. यावर मात करण्यासाठी परिणामकारक ठरणारे वनराई बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. १५ तालुक्यांत तीन हजार २४७ ठिकाणी बांधलेल्या वनराई बंधाºयांच्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. यासाठी एक कोटी २६ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर ४२ हजार ७० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.तापमानामध्ये सातत्याने उष्णता वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशांपर्यंत गेले होते. उष्णता प्रखर असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते, यासाठी प्रशासनामार्फत वनराई बंधारे बांधले जातात.पावसाळा संपल्यानंतर साधारणत: आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसेच बंधारे बांधण्यासाठी स्थानिक नागरिक श्रमदानातून हे बंधारे बांधतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले यांचे पाणी अडवले जाते.पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाळा संपल्यावरच ते बांधण्यावर भर दिला जातो. हे बंधारे फक्त वर्षभरासाठीच टिकतात. पुढच्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुटतात. त्यानंतर ते पुन्हा पावसानंतर उभारले जातात, ही प्रक्रिया सुरूच राहते. कमी खर्चात आणि श्रमदानातून केलेल्या या योजनेचा फायदा पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी होतो.याच पाण्यावर रब्बी हंगामातील भाजीपाला शेती, तसेच तृण धान्य पीकलागवड केली जाते. त्याचप्रमाणे याच पाण्याचा उपयोग कुटीरोद्योग म्हणजे वीटभट्टी, मत्स्य बीज यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येता. घरगुती वापराबरोबरच पशुधन आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठीही होत आहे.>वनराई बंधारे हे आकाराने छोटे-छोटे दिसत असले, तरी त्यांचा सकात्मक आणि परिणामकारक उपयोग होतो. यासाठीच वनराई बंधारे बांधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. २०१७-१८ या कालावधीत तीन हजार २४७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.>जिल्ह्यात बांधण्यात आलेले वनराई बंधारे (२०१७-१८)तालुका बांधलेले बंधारे जलसाठा (लीटर) मनुष्यबळ एकूण खर्चरोहा ३१९ १४,३५,५०,००० ४७८५ १७,५४,५००पनवेल ३१२ १४,०४,००,००० ४६८० १७,१६,०००माणगाव ४१२ १८,५४,००,००० ३८५० १५,६७,०००खालापूर २४३ १०,९३,५०,००० ३६४५ १३,३६,५००पोलादपूर २३२ १०,४४,००,००० ३३९० १२,४९,०००महाड २९० १३,०५,००,००० ३२१९ १२,५३,०००अलिबाग २६० ११,७०,००,००० ३१५० ९,४५,०००म्हसळा १८६ ८,३७,००,००० २६७० ९,८७,०००सुधागड १७३ ७,७८,५०,००० २४६० ९,११,०००तळा १५६ ७,०२,००,००० २३४० ८,५८,०००पेण १५३ ६,८८,५०,००० १९०५ ७,२४,५००मुरुड १५२ ६,८४,००,००० १९०५ ७,२३,५००कर्जत १७५ ७,८७,५०,००० १६५० ६,७०,०००श्रीवर्धन ११७ ५,२६,५०,००० १४५५ ५,५३,५००उरण ६७ ३,०१,५०,००० ९७५ ३,५९,५००एकूण ३२४७ १,४६,११,५०,००० ४२,०७० १,२६,२१,०००