शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:15 IST

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावते. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेल या कोरड्या पडतात. यावर मात करण्यासाठी परिणामकारक ठरणारे वनराई बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. १५ तालुक्यांत तीन हजार २४७ ठिकाणी बांधलेल्या वनराई बंधाºयांच्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. यासाठी एक कोटी २६ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर ४२ हजार ७० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.तापमानामध्ये सातत्याने उष्णता वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशांपर्यंत गेले होते. उष्णता प्रखर असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते, यासाठी प्रशासनामार्फत वनराई बंधारे बांधले जातात.पावसाळा संपल्यानंतर साधारणत: आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसेच बंधारे बांधण्यासाठी स्थानिक नागरिक श्रमदानातून हे बंधारे बांधतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले यांचे पाणी अडवले जाते.पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाळा संपल्यावरच ते बांधण्यावर भर दिला जातो. हे बंधारे फक्त वर्षभरासाठीच टिकतात. पुढच्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुटतात. त्यानंतर ते पुन्हा पावसानंतर उभारले जातात, ही प्रक्रिया सुरूच राहते. कमी खर्चात आणि श्रमदानातून केलेल्या या योजनेचा फायदा पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी होतो.याच पाण्यावर रब्बी हंगामातील भाजीपाला शेती, तसेच तृण धान्य पीकलागवड केली जाते. त्याचप्रमाणे याच पाण्याचा उपयोग कुटीरोद्योग म्हणजे वीटभट्टी, मत्स्य बीज यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येता. घरगुती वापराबरोबरच पशुधन आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठीही होत आहे.>वनराई बंधारे हे आकाराने छोटे-छोटे दिसत असले, तरी त्यांचा सकात्मक आणि परिणामकारक उपयोग होतो. यासाठीच वनराई बंधारे बांधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. २०१७-१८ या कालावधीत तीन हजार २४७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.>जिल्ह्यात बांधण्यात आलेले वनराई बंधारे (२०१७-१८)तालुका बांधलेले बंधारे जलसाठा (लीटर) मनुष्यबळ एकूण खर्चरोहा ३१९ १४,३५,५०,००० ४७८५ १७,५४,५००पनवेल ३१२ १४,०४,००,००० ४६८० १७,१६,०००माणगाव ४१२ १८,५४,००,००० ३८५० १५,६७,०००खालापूर २४३ १०,९३,५०,००० ३६४५ १३,३६,५००पोलादपूर २३२ १०,४४,००,००० ३३९० १२,४९,०००महाड २९० १३,०५,००,००० ३२१९ १२,५३,०००अलिबाग २६० ११,७०,००,००० ३१५० ९,४५,०००म्हसळा १८६ ८,३७,००,००० २६७० ९,८७,०००सुधागड १७३ ७,७८,५०,००० २४६० ९,११,०००तळा १५६ ७,०२,००,००० २३४० ८,५८,०००पेण १५३ ६,८८,५०,००० १९०५ ७,२४,५००मुरुड १५२ ६,८४,००,००० १९०५ ७,२३,५००कर्जत १७५ ७,८७,५०,००० १६५० ६,७०,०००श्रीवर्धन ११७ ५,२६,५०,००० १४५५ ५,५३,५००उरण ६७ ३,०१,५०,००० ९७५ ३,५९,५००एकूण ३२४७ १,४६,११,५०,००० ४२,०७० १,२६,२१,०००