शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

पावसाळा संपताच तलाव कोरडा, वनविभागाने चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:51 IST

नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला.

कांता हाबळे नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी तलाव खोदला आहे. तेथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने हा तलाव पावसाळा संपताच कोरडा पडला आहे. वनविभागाने कोणतीही शहानिशा न करता, नियोजन न करता, तलावासाठी चुकीची जागा निवडली, असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनविभागाने जिल्हा नियोजन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून वन तलाव बांधले; परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच नद्या, ओढे वाहत असताना वन विभागाने सापेले येथे बांधलेले ३३ बाय ३३ मीटर्सचे वन तलाव अगदी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत, वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या निकृष्ट कामामुळेच तलावाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.कर्जत तालुक्यातील तांबस या महसुली गावालगत असलेल्या सापेले गावाला लागून ६२ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. वनविभागाने डोंगर उतारावर हा तलाव बांधला आहे. तर तलावाच्या खालच्या बाजूचे क्षेत्र उताराचे असून, राजनाल्याच्या क्षेत्राखाली जमिनी येत असल्याने जमीन बाराही महिने पाण्याखाली येतात. शिवाय राजनाल्याच्या खालच्या बाजूला वनविभागाच्या जमिनीचे क्षेत्र असूनही अधिकाºयांनी तलावासाठी ती जागा का निवडली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाची पाहणी शिवसेना विभागप्रमुख योगेश दाभाडे, कृष्णा जोशी, मनोज पवार, सुनील मसणे, बाजीराव दळवी, राजेश शेळके, अनिल जाधव यांनी केली.