शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पावसाळा संपताच तलाव कोरडा, वनविभागाने चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:51 IST

नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला.

कांता हाबळे नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी तलाव खोदला आहे. तेथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने हा तलाव पावसाळा संपताच कोरडा पडला आहे. वनविभागाने कोणतीही शहानिशा न करता, नियोजन न करता, तलावासाठी चुकीची जागा निवडली, असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनविभागाने जिल्हा नियोजन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून वन तलाव बांधले; परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच नद्या, ओढे वाहत असताना वन विभागाने सापेले येथे बांधलेले ३३ बाय ३३ मीटर्सचे वन तलाव अगदी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत, वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या निकृष्ट कामामुळेच तलावाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.कर्जत तालुक्यातील तांबस या महसुली गावालगत असलेल्या सापेले गावाला लागून ६२ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. वनविभागाने डोंगर उतारावर हा तलाव बांधला आहे. तर तलावाच्या खालच्या बाजूचे क्षेत्र उताराचे असून, राजनाल्याच्या क्षेत्राखाली जमिनी येत असल्याने जमीन बाराही महिने पाण्याखाली येतात. शिवाय राजनाल्याच्या खालच्या बाजूला वनविभागाच्या जमिनीचे क्षेत्र असूनही अधिकाºयांनी तलावासाठी ती जागा का निवडली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाची पाहणी शिवसेना विभागप्रमुख योगेश दाभाडे, कृष्णा जोशी, मनोज पवार, सुनील मसणे, बाजीराव दळवी, राजेश शेळके, अनिल जाधव यांनी केली.