शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

पावसाळा संपताच तलाव कोरडा, वनविभागाने चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:51 IST

नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला.

कांता हाबळे नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी तलाव खोदला आहे. तेथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने हा तलाव पावसाळा संपताच कोरडा पडला आहे. वनविभागाने कोणतीही शहानिशा न करता, नियोजन न करता, तलावासाठी चुकीची जागा निवडली, असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनविभागाने जिल्हा नियोजन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून वन तलाव बांधले; परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच नद्या, ओढे वाहत असताना वन विभागाने सापेले येथे बांधलेले ३३ बाय ३३ मीटर्सचे वन तलाव अगदी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत, वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या निकृष्ट कामामुळेच तलावाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.कर्जत तालुक्यातील तांबस या महसुली गावालगत असलेल्या सापेले गावाला लागून ६२ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. वनविभागाने डोंगर उतारावर हा तलाव बांधला आहे. तर तलावाच्या खालच्या बाजूचे क्षेत्र उताराचे असून, राजनाल्याच्या क्षेत्राखाली जमिनी येत असल्याने जमीन बाराही महिने पाण्याखाली येतात. शिवाय राजनाल्याच्या खालच्या बाजूला वनविभागाच्या जमिनीचे क्षेत्र असूनही अधिकाºयांनी तलावासाठी ती जागा का निवडली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाची पाहणी शिवसेना विभागप्रमुख योगेश दाभाडे, कृष्णा जोशी, मनोज पवार, सुनील मसणे, बाजीराव दळवी, राजेश शेळके, अनिल जाधव यांनी केली.