शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण

By admin | Updated: August 13, 2016 04:02 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर

कार्लेखिंड : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून भरण्यात आलेले खड्डे पुन्हा तयार होत आहे. तेथे टाकण्यात आलेली माती आणि खडी पुन्हा खड्ड्यांच्यावर आल्यामुळे रस्ता खाली, वर झाला आहे. त्यामुळे वाहनांची गती मुंगीच्या चालीसारखी झाली आहे. दररोज या महामार्गावरु न लाखो वाहने प्रवास करतात,यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडी होत असते. खड्डे असल्यामुळे एखादे अवजड वाहन बंद पडते, हे प्रकार आता नित्याचाच झाला आहे. यामुळे कर्मचारीवर्ग, शाळा, कॉलेजातील विद्यार्थी तसेच याच मार्गावरून दर दहा मिनिटांनी जाणारी रुग्णवाहिका अडकून राहते हे आता नित्याचे होत आहे. त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी ठोकळे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहकाला कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये काहीना काही अपघातांची मालिका सुरु आहे. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता वाहतूक पोलिसांवर ताण पडत आहे. या महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहे. अख्ख्या उन्हाळ्यात या मार्गावर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात न आल्यामुळे यावर्षी जास्त त्रास सहन करावा लागला आहे. सध्याच्या परिस्थितीला होणारा खर्च हा उन्हाळ्यात करु न मार्ग सुस्थितीत केला असता तर त्यापेक्षा खर्च कमी झाला असता असा सूर जनतेतून उमटत आहे. गणेशोत्सव काळात काय होईल याचा विचार करुन कोकणवासीय त्रस्त होत आहेत. बुधवारी परिवहन मंत्री यांनी २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील खड्डे भरण्याचे सुचविले आहे. (वार्ताहर)