शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: April 24, 2017 02:34 IST

यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.

अलिबाग : यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यातील काही रस्ते हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्यमार्ग यांच्या अखत्यारीत आहेत. जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे आाणि मुंबई-गोवा हे दोन महामार्ग जातात. यातील मुंबई-गोवा महामार्ग वगळता अन्य महामार्गाची अवस्था सध्यातरी चांगली असल्याचे दिसून येते.मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. पळस्पे-इंदापूर या पहिल्या टप्प्यातील या मार्गावरील पुलांचे काम, कर्नाळा खिंडीचा काही भाग तसेच काही ठिकाणच्या वळणाचे काम अद्याप बाकी आहे. माणगाव, कोलाड आणि पेण येथे तीन पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत. पहिला टप्पा पळस्पे-इंदापूर आणि इंदापूर- झाराप या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यामुळे यंद्याच्या पावसातही खड्ड्यातून वाट काढावी लागणार का अशी भीती सतावत आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मार्ग सुस्थितीत करण्यात येईल, असा दावा ठेकेदाराने केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम अद्याप सुरु आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काही रस्त्यांची आताच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भर पावसात या रस्त्यांवरुन प्रवास करणे कठीण होणार आहे. अलिबाग-रोहे, अलिबाग-रेवस, अलिबाग-मुरुड या रस्त्यांवर ठिगळे लावण्यात आली आहेत. ती पहिल्या पावसातच निघण्याची शक्यता असल्याने या रस्त्यांची सुध्दा दैना उडणार असल्याचे चित्र आहे. या मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली होती. अलिबाग-चौल रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे. परंतु त्याचे काम कासव गतीने होत असल्याने आताच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ््यामध्ये तर या मार्गावरुन प्रवास करणे केवळ अशक्यच ठरणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. रस्त्यांची कामे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावीत, अशा नियम आहे. परंतु रस्त्यांची कामे ही पावसाच्या आठ दिवस आधी केली जातात. त्यामुळे रस्ते पहिल्याच पावसात उखडतात. रस्त्यांची कामे पावसाळ््यापूर्वी तातडीने करावीत अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)मुरु ड-आंबोली रस्त्याची दुरवस्थानांदगाव/ मुरुड : आगरदांडा बंदर विकसित होईल व मुरु ड तालुक्यातील सर्व रस्ते चकाचक होतील अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात तसे न घडल्याने मुरु ड तालुक्यातील नागरिक नाराज असून आता सर्व रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना सुद्धा या रस्त्यांच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम खात्याच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.लवकरच मुरु ड तालुक्यातील संघर्ष समितीमार्फत तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी या रास्ता रोकोत शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. मुरु ड ते आंबोली रस्ता हा बांधकाम खात्याने मागील तीन ते चार वर्षांपूर्वी बनवला परंतु प्रत्यक्ष काम सुरु असताना अभियंते गैरहजर राहिल्याने संबंधित ठेकेदारांना मोठी सूट मिळत असून रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड येथील जनता करीत आहे. चार वर्षांपूर्वीचा रस्ता खराब झाल्याने आता येथे प्रवास करणे फार जिकिरीचे झाले आहे. अरु ंद रस्ता व प्रत्येक ठिकाणी खड्डे यामुळे या भागातील नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. दुचाकी, तीनचाकी वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नीलेश खिलारे यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले की, तेलवाडे ते आंबोली या रस्त्याची निविदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतली असून येत्या आठ ते दहा दिवसात या कामास सुरु वात होईल. तेलवाडे ते आंबोली या रस्त्याची रु ंदी सुद्धा वाढवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या सार्वजनिक बांधकाम खाते ते डोंगरीपर्यंतचे काम जोरदार सुरु असून येथील काम संपताच या रस्त्याच्या कामास सुरु वात होईल अशी माहिती खिलारे यांनी दिली. हे सर्व रस्ते होत असताना मात्र मुरु ड ते साळावपर्यंतचा रस्ता दुर्लक्षित झाला असून या रस्त्याच्या दुरु स्तीकडे अद्याप लक्ष दिले जात नसल्याची ओरड जनतेकडून करण्यात येत आहे.