शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

बिरवाडीत प्रदूषणामुळे काळ नदीपात्रातील पाण्याचा रंग बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:31 IST

चौदा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या जैसे थे; ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू

- दीपक साळुंखे बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीनजीकच्या काळ नदीपात्राच्या पाण्याला प्रदूषणामुळे काळा रंग आला आहे. त्यामुळे परिसरातील चौदा गावांच्या नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करून देखील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवून जॅकवेलद्वारे चौदा गावातील नळपाणी पुरवठा योजना कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कारखान्यांचे प्रदूषित सांडपाणी व नागरी वस्तीतील सांडपाणी बिरवाडी काळ नदीपात्रात मिसळते. परिणामी नदीवरून कार्यरत असणाऱ्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे चौदा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ अरु ण घाडगे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, बिरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचाºयांमार्फत बिरवाडी काळ नदीपात्रातील पाणी काळ्या रंगाचे झाल्याची माहिती ८ डिसेंबर रोजी प्राप्त झाली असून नेमके पाणी कशामुळे काळे झाले याकरिता पाण्याचे नमुने तपासणीकरिता आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.सांडपाणी नदीत मिसळलेप्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी प्रकाश ताटे यांच्याजवळ संपर्क साधला असता बिरवाडी ग्रामपंचायतीसह काळ नदीपात्रावरील ग्रामपंचायतींना नोटिसा बजाविण्यात आल्या असून नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच नागरी वस्तीतील सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याकरिता एमआयडीसीने यंत्रणा उभारावी अशी मागणी ग्रामपंचायतींकडून संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करण्यात करण्यात आली आहे. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप झाली नसल्याने नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे क्षेत्राधिकारी ताटे यांनी स्पष्ट केले.महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला आलेल्या काळा रंग चिंतेची बाब असून या प्रकरणी संबंधितांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बिरवाडीमधील नागरिक मयूर रामराव मोरे यांनी केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRaigadरायगड