शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
4
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
5
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
6
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
7
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
8
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
9
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
10
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
11
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
12
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
13
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
14
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
15
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
16
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
17
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
18
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
19
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
20
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडीत प्रदूषणामुळे काळ नदीपात्रातील पाण्याचा रंग बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:31 IST

चौदा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या जैसे थे; ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू

- दीपक साळुंखे बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीनजीकच्या काळ नदीपात्राच्या पाण्याला प्रदूषणामुळे काळा रंग आला आहे. त्यामुळे परिसरातील चौदा गावांच्या नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करून देखील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवून जॅकवेलद्वारे चौदा गावातील नळपाणी पुरवठा योजना कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कारखान्यांचे प्रदूषित सांडपाणी व नागरी वस्तीतील सांडपाणी बिरवाडी काळ नदीपात्रात मिसळते. परिणामी नदीवरून कार्यरत असणाऱ्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे चौदा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ अरु ण घाडगे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, बिरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचाºयांमार्फत बिरवाडी काळ नदीपात्रातील पाणी काळ्या रंगाचे झाल्याची माहिती ८ डिसेंबर रोजी प्राप्त झाली असून नेमके पाणी कशामुळे काळे झाले याकरिता पाण्याचे नमुने तपासणीकरिता आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.सांडपाणी नदीत मिसळलेप्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी प्रकाश ताटे यांच्याजवळ संपर्क साधला असता बिरवाडी ग्रामपंचायतीसह काळ नदीपात्रावरील ग्रामपंचायतींना नोटिसा बजाविण्यात आल्या असून नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच नागरी वस्तीतील सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याकरिता एमआयडीसीने यंत्रणा उभारावी अशी मागणी ग्रामपंचायतींकडून संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करण्यात करण्यात आली आहे. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप झाली नसल्याने नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे क्षेत्राधिकारी ताटे यांनी स्पष्ट केले.महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला आलेल्या काळा रंग चिंतेची बाब असून या प्रकरणी संबंधितांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बिरवाडीमधील नागरिक मयूर रामराव मोरे यांनी केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRaigadरायगड