शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

वदप तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:20 IST

शेतीचे मोठे नुकसान : वाल, मूग, हरभरा कडधान्यांचे पीक गेले वाहून

कर्जत : तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.

वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दीड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आउटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काढण्यात आले नाही, तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणाऱ्या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बुधवारी सकाळी ९च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळीची शेती या पाण्यात वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेल्याने आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

राजनाल्याचे पाणी तलावात झिरपत असल्याचे आणि तलावाला योग्य आउटलेट काढण्याबाबत गावकºयांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला सांगितले. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच आज ही परिस्थिती ओढवली, त्यांचा हलगर्जीपणा आम्हाला भोवला, माझ्या वालाच्या शेतीचे नुकसान झाले.- नितेश पाटील, शेतकरीशेतकरी चिंताग्रस्तच्तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वादप येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने एकू ण २५ एकर शेतातील हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून हे नुकसानकसे भरून काढायचे या विवंचनेत आहे.काही दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढली, राजनाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तलावात झिरपल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला याला जलसंपदा विभागच जबाबदार आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.- नीरा विचारे, सरपंचया संदर्भात राजनाला विभागाच्या अधिकाºयांना योग्य सूचना दिल्यात, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत