शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

वदप तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:20 IST

शेतीचे मोठे नुकसान : वाल, मूग, हरभरा कडधान्यांचे पीक गेले वाहून

कर्जत : तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.

वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दीड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आउटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काढण्यात आले नाही, तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणाऱ्या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बुधवारी सकाळी ९च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळीची शेती या पाण्यात वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेल्याने आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

राजनाल्याचे पाणी तलावात झिरपत असल्याचे आणि तलावाला योग्य आउटलेट काढण्याबाबत गावकºयांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला सांगितले. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच आज ही परिस्थिती ओढवली, त्यांचा हलगर्जीपणा आम्हाला भोवला, माझ्या वालाच्या शेतीचे नुकसान झाले.- नितेश पाटील, शेतकरीशेतकरी चिंताग्रस्तच्तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वादप येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने एकू ण २५ एकर शेतातील हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून हे नुकसानकसे भरून काढायचे या विवंचनेत आहे.काही दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढली, राजनाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तलावात झिरपल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला याला जलसंपदा विभागच जबाबदार आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.- नीरा विचारे, सरपंचया संदर्भात राजनाला विभागाच्या अधिकाºयांना योग्य सूचना दिल्यात, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत