शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

वदप तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:20 IST

शेतीचे मोठे नुकसान : वाल, मूग, हरभरा कडधान्यांचे पीक गेले वाहून

कर्जत : तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.

वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दीड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आउटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काढण्यात आले नाही, तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणाऱ्या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बुधवारी सकाळी ९च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळीची शेती या पाण्यात वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेल्याने आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

राजनाल्याचे पाणी तलावात झिरपत असल्याचे आणि तलावाला योग्य आउटलेट काढण्याबाबत गावकºयांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला सांगितले. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच आज ही परिस्थिती ओढवली, त्यांचा हलगर्जीपणा आम्हाला भोवला, माझ्या वालाच्या शेतीचे नुकसान झाले.- नितेश पाटील, शेतकरीशेतकरी चिंताग्रस्तच्तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वादप येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने एकू ण २५ एकर शेतातील हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून हे नुकसानकसे भरून काढायचे या विवंचनेत आहे.काही दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढली, राजनाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तलावात झिरपल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला याला जलसंपदा विभागच जबाबदार आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.- नीरा विचारे, सरपंचया संदर्भात राजनाला विभागाच्या अधिकाºयांना योग्य सूचना दिल्यात, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत