शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:36 IST

रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयाने तडाखा दिल्याने जिल्ह्यातील भातासह आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.रायगड जिल्हा हा भाताचे कोठार होता. जिल्ह्यातील भाताचे क्षेत्र हे सुमारे एक लाख १० हजार हेक्टर आहे, त्यामुळे शेतातून भाताचे चांगले उत्पादन अपेक्षित असते. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीतील भात हे मोठ्या प्रमाणात स्वत:साठी वापरतो. अतिशय कमी प्रमाणातील शेतकरी आपले भात व्यापाºयांना विकतात.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पडलेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक आडवे झाले होते, तर तब्बल चार हजार आंब्याच्या झाडांना धोका पोहोचल्याने शेतकºयांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.साधारणत: जून महिन्यात मेहनतीने लावलेल्या भाताचे उत्पादन घेण्याची वेळ शेतकºयांसाठी आता उजाडलेली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडोळ, पवेळ या ग्रामीण भागातील शेतकºयांनी आपापल्या शिवारातील भात कापणीला सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवात बुधवारी घटस्थापना झाल्याच्या लगेचच दुसºया दिवशी भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीची कामे करण्यासाठी याआधी एकमेकांच्या शेतात जाऊन त्यांना मदत केली जायची. सध्या शिकलेले तरुण शेतीपासून दूर जात असल्याने शेतात काम करण्याचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर शेतात काम करणाºयांची मजुरीदेखील वाढली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला आहे. त्यातच निसर्गाची अधूनमधून अवकृपा होत असल्याने शेतीचे नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका हा शेतकºयांना बसत आहे, त्यामुळेच शेतकºयांसाठी शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्यांचा झाला आहे.दरम्यान, या वर्षी भाताच्या उत्पादनामध्ये २० टक्क्यांनी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुरेसा पाऊस न झाल्याने नुकसानसप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताचे पीक तयार होणे अपेक्षित होते. मात्र, पुरेसा पाऊस न मिळाल्याने काही प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या शेतातमध्ये भाताचे पीक आले होते; परंतु ढगाळ वातावरणामुळे पीक काढण्याची हिंमत शेतकरी करू शकले नाहीत. समजा त्यांनी पीक काढले असते आणि अचानक पाऊस आला असता, तर शेतात काढून ठेवलेले भाताचे पीक भिजून शेतकरी आर्थिक खाईत लोटला असता.आॅक्टोबर हिटचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे शेतकºयांसह मजुरांना शेतात काम करणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या कालावधीत शेतीची कामे करण्यात येत आहेत. याआधी सकाळी १० ते १ तर दुपारी ३ ते ६ अशी शेतीच्या कामाची वेळ होती. आता त्यामध्ये सोयीस्कर बदल करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नंदू सोडवे यांनी दिली.

 

टॅग्स :Raigadरायगड