शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:36 IST

रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयाने तडाखा दिल्याने जिल्ह्यातील भातासह आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.रायगड जिल्हा हा भाताचे कोठार होता. जिल्ह्यातील भाताचे क्षेत्र हे सुमारे एक लाख १० हजार हेक्टर आहे, त्यामुळे शेतातून भाताचे चांगले उत्पादन अपेक्षित असते. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीतील भात हे मोठ्या प्रमाणात स्वत:साठी वापरतो. अतिशय कमी प्रमाणातील शेतकरी आपले भात व्यापाºयांना विकतात.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पडलेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक आडवे झाले होते, तर तब्बल चार हजार आंब्याच्या झाडांना धोका पोहोचल्याने शेतकºयांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.साधारणत: जून महिन्यात मेहनतीने लावलेल्या भाताचे उत्पादन घेण्याची वेळ शेतकºयांसाठी आता उजाडलेली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडोळ, पवेळ या ग्रामीण भागातील शेतकºयांनी आपापल्या शिवारातील भात कापणीला सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवात बुधवारी घटस्थापना झाल्याच्या लगेचच दुसºया दिवशी भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीची कामे करण्यासाठी याआधी एकमेकांच्या शेतात जाऊन त्यांना मदत केली जायची. सध्या शिकलेले तरुण शेतीपासून दूर जात असल्याने शेतात काम करण्याचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर शेतात काम करणाºयांची मजुरीदेखील वाढली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला आहे. त्यातच निसर्गाची अधूनमधून अवकृपा होत असल्याने शेतीचे नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका हा शेतकºयांना बसत आहे, त्यामुळेच शेतकºयांसाठी शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्यांचा झाला आहे.दरम्यान, या वर्षी भाताच्या उत्पादनामध्ये २० टक्क्यांनी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुरेसा पाऊस न झाल्याने नुकसानसप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताचे पीक तयार होणे अपेक्षित होते. मात्र, पुरेसा पाऊस न मिळाल्याने काही प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या शेतातमध्ये भाताचे पीक आले होते; परंतु ढगाळ वातावरणामुळे पीक काढण्याची हिंमत शेतकरी करू शकले नाहीत. समजा त्यांनी पीक काढले असते आणि अचानक पाऊस आला असता, तर शेतात काढून ठेवलेले भाताचे पीक भिजून शेतकरी आर्थिक खाईत लोटला असता.आॅक्टोबर हिटचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे शेतकºयांसह मजुरांना शेतात काम करणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या कालावधीत शेतीची कामे करण्यात येत आहेत. याआधी सकाळी १० ते १ तर दुपारी ३ ते ६ अशी शेतीच्या कामाची वेळ होती. आता त्यामध्ये सोयीस्कर बदल करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नंदू सोडवे यांनी दिली.

 

टॅग्स :Raigadरायगड