शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:36 IST

रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयाने तडाखा दिल्याने जिल्ह्यातील भातासह आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.रायगड जिल्हा हा भाताचे कोठार होता. जिल्ह्यातील भाताचे क्षेत्र हे सुमारे एक लाख १० हजार हेक्टर आहे, त्यामुळे शेतातून भाताचे चांगले उत्पादन अपेक्षित असते. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीतील भात हे मोठ्या प्रमाणात स्वत:साठी वापरतो. अतिशय कमी प्रमाणातील शेतकरी आपले भात व्यापाºयांना विकतात.काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पडलेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक आडवे झाले होते, तर तब्बल चार हजार आंब्याच्या झाडांना धोका पोहोचल्याने शेतकºयांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.साधारणत: जून महिन्यात मेहनतीने लावलेल्या भाताचे उत्पादन घेण्याची वेळ शेतकºयांसाठी आता उजाडलेली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडोळ, पवेळ या ग्रामीण भागातील शेतकºयांनी आपापल्या शिवारातील भात कापणीला सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवात बुधवारी घटस्थापना झाल्याच्या लगेचच दुसºया दिवशी भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीची कामे करण्यासाठी याआधी एकमेकांच्या शेतात जाऊन त्यांना मदत केली जायची. सध्या शिकलेले तरुण शेतीपासून दूर जात असल्याने शेतात काम करण्याचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर शेतात काम करणाºयांची मजुरीदेखील वाढली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला आहे. त्यातच निसर्गाची अधूनमधून अवकृपा होत असल्याने शेतीचे नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका हा शेतकºयांना बसत आहे, त्यामुळेच शेतकºयांसाठी शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्यांचा झाला आहे.दरम्यान, या वर्षी भाताच्या उत्पादनामध्ये २० टक्क्यांनी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुरेसा पाऊस न झाल्याने नुकसानसप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताचे पीक तयार होणे अपेक्षित होते. मात्र, पुरेसा पाऊस न मिळाल्याने काही प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या शेतातमध्ये भाताचे पीक आले होते; परंतु ढगाळ वातावरणामुळे पीक काढण्याची हिंमत शेतकरी करू शकले नाहीत. समजा त्यांनी पीक काढले असते आणि अचानक पाऊस आला असता, तर शेतात काढून ठेवलेले भाताचे पीक भिजून शेतकरी आर्थिक खाईत लोटला असता.आॅक्टोबर हिटचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे शेतकºयांसह मजुरांना शेतात काम करणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या कालावधीत शेतीची कामे करण्यात येत आहेत. याआधी सकाळी १० ते १ तर दुपारी ३ ते ६ अशी शेतीच्या कामाची वेळ होती. आता त्यामध्ये सोयीस्कर बदल करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नंदू सोडवे यांनी दिली.

 

टॅग्स :Raigadरायगड