शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

थंडीमुळे महाड तालुका गारठला, धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:49 IST

गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती.

दासगाव : गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून महाड तालुका गारठला आहे. धुक्यामुळे महामार्गाची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.थंडीचे दिवस असूनदेखील गेल्या आठवड्यापर्यंत थंडी गायब होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे. महाड तालुका गारठून गेला आहे. रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी, तसेच मोठ्या प्रमाणात पडणारे धुके याचा मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपासून परिसरात धुक्याची चादर असल्याने महामार्ग तसेच तालुक्यातील अंतर्गत गावातील जाणाºया वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे महामार्गावरून जाणाºया वाहनचालकांना काहीच दिसत नसल्याने वाहने धिम्या गतीने चालवावी लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडी व धुक्यामुळे (दव) तालुक्यातील कडधान्याच्या शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. उशिरापर्यंत पडलेला पाऊस व थंडी यामुळे कडधान्याचे पीक चांगले मिळण्याच्या आशेने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Raigadरायगड