शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर समाज जोडणारे महामानव

By admin | Updated: March 21, 2017 02:08 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हणविरोधी कधीच नव्हते, स्पृश्य-अस्पृश्यांमधील दरी संपुष्टात आणण्यासाठीच

महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हणविरोधी कधीच नव्हते, स्पृश्य-अस्पृश्यांमधील दरी संपुष्टात आणण्यासाठीच डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज जोडणारेच महामानव होते, असे उद्गार रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.चवदार तळे सत्याग्रहाच्या ९० व्या वर्धापन दिनी ते महाडमध्ये बोलत होते. ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले त्या ऐतिहासिक क्रांतीस्तंभ परिसराच्या सुशोभीकरणासाठी व विकासासाठी ही जागा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे निर्णय घेण्यात येईल. याबाबत येत्या काही दिवसात नगरपरिषदेच्या प्रशासनासोबत बैठक घेतली जाईल, असेही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रातील मोदी सरकार दलित विरोधी आणि घटना बदलू पाहत असल्याचा विरोधकांच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. उलट संपूर्ण देशात जातीधर्मांमध्ये आर्थिक व सामाजिक समतोल राखण्याची भूमिका मोदी सरकारची असल्याचे रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले. या धोरणामुळेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकीचे ठरवीत भाजपाने तीनशे पंचवीस जागा जिंकल्या. महाराष्ट्रात आणि देशभरात नोटाबंदीचा निर्णय सामान्य जनतेला मान्य असल्याचे हे द्योतक असल्याचेही आठवले यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा कायम अन्यायाविरोधात होता. त्यांच्या आंदोलनात बहुजन समाजासह ब्राम्हण समाजातील व्यक्तीही सहभागी होत असत. त्यांनी डॉ. आंबेडकर हे ब्राम्हण विरोधी होते, हा गैरसमज असल्याचे आठवले यांनी सांगितले. आजही देशातील अनेक ठिकाणी सामाजिक विषमता आहे. डॉ. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून आज ९० वर्षे लोटली तरी देशातील ही सामाजिक विषमता संपुष्टात आलेली नाही. याबाबत आठवले यांनी खंत व्यक्त केली. मात्र चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या शंभराव्या वर्धापन दिनापर्यंत येत्या दहा वर्षांत या सामाजिक विषमतेचा पूर्णपणे नायनाट होईल असा विश्वासही यांनी व्यक्त केला.रामदास आठवले यांचे मिरवणुकीने चवदार तळे येथील स्मारकात आगमन झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, एकच साहेब बाबासाहेब आदि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आठवले यांनी चवदार तळे व क्रांतीस्तंभ येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.या वेळी रायगड जिल्हा रिपाइंचे अध्यक्ष जगदीश गायकवाड, तालुकाध्यक्ष मोहन खांबे आदी उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. (वार्ताहर)राष्ट्रीय महामार्गावर उसळला जनसागर-दासगाव : चवदार तळे सत्याग्रह दिवस म्हणजे जगाच्या पटलावरती महाड शहराची समतेची ओळख आहे. २० मार्च चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशातून आंबेडकरी जनता महाडच्या चवदार तळ्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चवदार तळे सत्याग्रह दिवसाला एखाद्या जत्रेसारखे स्वरूप सोेमवारी प्राप्त झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून नागरिक आल्याने मुंबई-महाड येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता.१९ मार्चपासूनच या चवदार तळ्यावर गर्दीला सुरुवात झाली. २० मार्च रोजी सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू झाली. मात्र दुपारनंतर या वाहतुकीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊन संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता. यामुळे चवदार तळ्यापासून महामार्ग तसेच आजूबाजूच्या १५ किमी अंतरापर्यंत निळे वादळ दिसून येत होते. महामार्गाने येणाऱ्या जनतेला कोणत्याही तऱ्हेचा वाहतुकीचा त्रास होवू नये यासाठी माणगाव, इंदापूर, लोणेरे महाडच्या महामार्गावर नातेखिंड या ठिकाणी अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौकीने बंदोबस्त ठेवला होता. यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत होती. (वार्ताहर)