शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माती भराव करू नका; नदीपात्र अरुं द करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:13 IST

नगरपालिके ला निवेदन: कुंडलिकेत नदीचे पात्र वाचविण्यासाठी रोहेकर रस्त्यावर

रोहा : कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करू नका, नदीचे पात्र अरु ंद करू नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका या मागणीसाठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगरपलिकेला कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

रोहेकरांची जीवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सुरू असून त्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून आणि बांधकाम करून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. रोह्याला अनेकदा महापुराचे मोठे फटके बसलेले आहेत. दर वर्षी पावसाळ्यात रोहा अष्टमी, भुवनेश्वर, वरसे, रोठसह परिसरात पुराचे पाणी शिरते. माती भरावामुळे पुलाचे गाळे सुद्धा कमी होताना दिसत आहेत. शिवाय पात्रात दोन्ही किनारी सिमेंटच्या भिंती तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नदीपात्र बंदिस्त होणार आहे. यामुळे पावसाळी पूर आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कळसगिरीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पात्रात घेण्याची नदीची क्षमता संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी ही परिस्थिती पहाता नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम करु नये. त्याचबरोबर पूररेषेत होत असलेल्या या भराव तातडीने थांबण्यात यावा तसेच पूररेषेत कोणतेही नियमबाह्य बांधकाम करु नये या मागणीसाठी रोहेकरांनी शहरातील राम मारु ती चौक ते रोहा नगर परिषद दरम्यान भव्य रॅली काढली होती.

या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, सामाजिक कार्यकर्ते अप्पा देशमुख, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, संतोष खटावकर, सुरेश मगर, राजेंद्र जाधव, अ‍ॅड. हर्षद साळवी यांनी केले. तर माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संदीप तटकरे, अरविंद जैन, नीता हजारे, नगरसेविका समीक्षा बामने, स्वरांजली शिर्केआदिंनी उपस्थित राहून या लोक चळवळीस सक्रि य पाठिंबा दर्शविला. नगरपालिकेच्या आवारात येताच रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सुरेश मगर, समीर शेडगे, संदीप तटकरे, राजेंद्र जाधव आदिंनी उपस्थितांना संबोधित केले. रॅलीमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी रॅलीला सामोरे जात निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनाचा सर्वंकषपणे विचार करु न आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.