शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

माती भराव करू नका; नदीपात्र अरुं द करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:13 IST

नगरपालिके ला निवेदन: कुंडलिकेत नदीचे पात्र वाचविण्यासाठी रोहेकर रस्त्यावर

रोहा : कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करू नका, नदीचे पात्र अरु ंद करू नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका या मागणीसाठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगरपलिकेला कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

रोहेकरांची जीवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सुरू असून त्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून आणि बांधकाम करून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. रोह्याला अनेकदा महापुराचे मोठे फटके बसलेले आहेत. दर वर्षी पावसाळ्यात रोहा अष्टमी, भुवनेश्वर, वरसे, रोठसह परिसरात पुराचे पाणी शिरते. माती भरावामुळे पुलाचे गाळे सुद्धा कमी होताना दिसत आहेत. शिवाय पात्रात दोन्ही किनारी सिमेंटच्या भिंती तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नदीपात्र बंदिस्त होणार आहे. यामुळे पावसाळी पूर आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कळसगिरीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पात्रात घेण्याची नदीची क्षमता संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी ही परिस्थिती पहाता नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम करु नये. त्याचबरोबर पूररेषेत होत असलेल्या या भराव तातडीने थांबण्यात यावा तसेच पूररेषेत कोणतेही नियमबाह्य बांधकाम करु नये या मागणीसाठी रोहेकरांनी शहरातील राम मारु ती चौक ते रोहा नगर परिषद दरम्यान भव्य रॅली काढली होती.

या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, सामाजिक कार्यकर्ते अप्पा देशमुख, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, संतोष खटावकर, सुरेश मगर, राजेंद्र जाधव, अ‍ॅड. हर्षद साळवी यांनी केले. तर माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संदीप तटकरे, अरविंद जैन, नीता हजारे, नगरसेविका समीक्षा बामने, स्वरांजली शिर्केआदिंनी उपस्थित राहून या लोक चळवळीस सक्रि य पाठिंबा दर्शविला. नगरपालिकेच्या आवारात येताच रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सुरेश मगर, समीर शेडगे, संदीप तटकरे, राजेंद्र जाधव आदिंनी उपस्थितांना संबोधित केले. रॅलीमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी रॅलीला सामोरे जात निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनाचा सर्वंकषपणे विचार करु न आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.