शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

रेवदंड्यातील रस्त्यावर डबकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 00:45 IST

अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

रेवदंडा : अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. रेवदंडा गाव आता शहरीकरणाच्या वळणावर झुकले आहे. अनेक कौलारू घरांची जागा तीन चार मजली इमारतींनी घेतली आहे. उभ्या राहिलेल्या इमारतींना रस्त्यावर गटारांची सोय उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या ग्रामसभेत इमारतींची संख्या वाढत असल्याने गटार योजना टप्प्याटप्प्याने राबवा असा मुद्दा चर्चेने गाजला मात्र सभा संपली आणि विषयही संपला अशी स्थिती झाली. सध्या पावसाने मुसंडी मारल्याने रस्त्यावर डबकी वाढत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रंगपंचमीचा अनुभव येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याच भागातील चौल गावच्या हद्दीत नाले तयार केले असून त्यांची स्वच्छता झालेली नाही. शिवाय त्या नाल्यांना संरक्षण कठडा किंवा दगडांची निशाणी नसल्याने या नाल्यात अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. नागाव भागात तर रस्त्यावर ओहोळ वाहतात अशी स्थिती पहावयास मिळते मात्र अनेक वर्षे उलटूनही या रस्त्याकडे व दुतर्फा नाले करण्यासाठी कोणी वाली मिळाला नाही, ही या भागाची शोकांतिका आहे. रेवदंडा शहरीकरणाकडे झुकत आहे. मात्र गटारे नसल्याने पर्जन्यवृष्टीत डासांचा हमखास प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गावातील अंतर्गत रस्ते उंच झाले, पर्यायाने मुख्य रस्त्यावरील पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले ही बाब पाहता बाजारपेठेतील रुंदीकरणाचे अडलेले घोडे दूर झाल्यास रुंदीकरणात गटारे होतील व पाण्याचा निचरा होईल अशी येथील व्यावसायिकांना अपेक्षा आहे. (वार्ताहर)