शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिवेआगर निसर्गरम्य समुद्रकिनारा होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:51 IST

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये

बोर्ली पंचतन - रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी सागरतट निधी, जिल्हा परिषद निधी तसेच १४ व्या वित्त आयोगातील निधीतून विविध विकासकामे आता पूर्ण झाली आहेत.विविध विकासकामांचे लोकार्पण आणि समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजन ७ एप्रिल २0१८ रोजी करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहेत.दिवेआगर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असून समुद्रकिनारी पर्यटकांना असुविधा व गैरसाय होत होती, परंतु आता सागरतट निधीमधून तसेच रायगड जिल्हा परिषद फंड व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये १४व्या वित्त आयोगातून मराठी शाळा क्र मांक १ व २ ना प्रत्येकी १ लॅपटॉप, प्रोजेक्टर, व पडदा तर दोन अंगणवाड्यांना प्रत्येकी १0-१0 बेंचेस तसेच अंगणवाडी नंबर १ मध्ये सॅनिटरी नॅपकिन मशिन व विघटन मशिन बसविण्यात येणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने व दिवेआगर समुद्रकिनारी सागरतट अभियान अंतर्गत निधी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध निधीमधून तळाणी व हनुमान पाखाडी किनाºयाजवळ खुल्या व्यायाम शाळा तसेच ज्या भागात पर्यटकांची जास्त प्रमाणात वर्दळ असते अशा रूपनारायण, हनुमान पाखाडी व तळाणी विभाग येथील समुद्रकिनारी एकूण १0 शौचालये व ३ चेंजिंग रूम्स तसेच जिल्हा परिषदेच्याग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ मुताºया त्याचप्रमाणे तीन ठिकाणी एकूण १0 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन, मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, समुद्रकिनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था त्याचप्रमाणे दिवेआगर भागामध्ये १0८ विविध प्रकारचे पक्षी नजरेस पडतात. त्यातील १६ पक्ष्यांची फोटोसहित माहिती समुद्रकिनारी लावण्यात येणार आहे. उंटांवर बसण्यासाठी स्टँड, अशा सुविधा दिवेआगरमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असून दिवेआगर समुद्रकिनारा सुशोभित व स्वच्छ तसेच पर्यटकांसाठी प्रत्येक सोयीयुक्त असा बनविण्याचा मानस सरपंच उदय बापट व त्यांच्या पूर्ण टीमचा असून या सर्व विकास योजनांचे लोकार्पण दिनांक ७ एप्रिल २0१८ रोजी सायंकाळी ५ वाजलेपासून करण्यात येणार आहे तर समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजनही केले असून सदर स्पर्धा दिवेआगर समुद्रकिनारी होणार आहेत.च्ग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ युरिनल्स, १0 सीसीटीव्ही कॅमेरे दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन.च्मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, किनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या