शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

दिवेआगर निसर्गरम्य समुद्रकिनारा होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:51 IST

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये

बोर्ली पंचतन - रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी सागरतट निधी, जिल्हा परिषद निधी तसेच १४ व्या वित्त आयोगातील निधीतून विविध विकासकामे आता पूर्ण झाली आहेत.विविध विकासकामांचे लोकार्पण आणि समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजन ७ एप्रिल २0१८ रोजी करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहेत.दिवेआगर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असून समुद्रकिनारी पर्यटकांना असुविधा व गैरसाय होत होती, परंतु आता सागरतट निधीमधून तसेच रायगड जिल्हा परिषद फंड व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये १४व्या वित्त आयोगातून मराठी शाळा क्र मांक १ व २ ना प्रत्येकी १ लॅपटॉप, प्रोजेक्टर, व पडदा तर दोन अंगणवाड्यांना प्रत्येकी १0-१0 बेंचेस तसेच अंगणवाडी नंबर १ मध्ये सॅनिटरी नॅपकिन मशिन व विघटन मशिन बसविण्यात येणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने व दिवेआगर समुद्रकिनारी सागरतट अभियान अंतर्गत निधी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध निधीमधून तळाणी व हनुमान पाखाडी किनाºयाजवळ खुल्या व्यायाम शाळा तसेच ज्या भागात पर्यटकांची जास्त प्रमाणात वर्दळ असते अशा रूपनारायण, हनुमान पाखाडी व तळाणी विभाग येथील समुद्रकिनारी एकूण १0 शौचालये व ३ चेंजिंग रूम्स तसेच जिल्हा परिषदेच्याग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ मुताºया त्याचप्रमाणे तीन ठिकाणी एकूण १0 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन, मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, समुद्रकिनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था त्याचप्रमाणे दिवेआगर भागामध्ये १0८ विविध प्रकारचे पक्षी नजरेस पडतात. त्यातील १६ पक्ष्यांची फोटोसहित माहिती समुद्रकिनारी लावण्यात येणार आहे. उंटांवर बसण्यासाठी स्टँड, अशा सुविधा दिवेआगरमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असून दिवेआगर समुद्रकिनारा सुशोभित व स्वच्छ तसेच पर्यटकांसाठी प्रत्येक सोयीयुक्त असा बनविण्याचा मानस सरपंच उदय बापट व त्यांच्या पूर्ण टीमचा असून या सर्व विकास योजनांचे लोकार्पण दिनांक ७ एप्रिल २0१८ रोजी सायंकाळी ५ वाजलेपासून करण्यात येणार आहे तर समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजनही केले असून सदर स्पर्धा दिवेआगर समुद्रकिनारी होणार आहेत.च्ग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ युरिनल्स, १0 सीसीटीव्ही कॅमेरे दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन.च्मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, किनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या