शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

जिल्ह्यात रंगांची साडेतीन काेटींची उलाढाल झाली ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:25 IST

काेराेनामुळे हाेळीचे रंग पडले फिके

आविष्कार देसाईरायगड : हाेळी आणि त्यापाठाेपाठ येणाऱ्या धुलिवंदन सणावर काेराेनाचे सावट पडले आहे. सार्वजनिक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर सण साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. यावर्षीही विविध रंगांना मागणी घटल्याने तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापारी चांगलेच हवालदिल झाले आहेत.

दरवर्षी हाेळी आणि धुलिवंदनाचा सण माेठ्या जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे; मात्र गेल्या वर्षी काेराेनाने घातलेला धुमाकूळ यावर्षीही सुरूच आहे. दिवसाला सुमारे ५०० रुग्ण सापडत असल्याने सरकारसह प्रशासानाची झाेप उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडणे मुश्कील हाेत आहे. धुळवड साजरी करताना रंगांची उधळ करण्यात येते. यासाठी बाजारात नेहमीप्रमाणे रंग विक्रीसाठी आले आहेत. मात्र,  सरकार आणि प्रशासनाने सण साजरे करण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रंग खेळण्यासाठी काेणीच बाहेर पडणार नाही. सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारातील रंगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. 

रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुंबई मशिद बंदर येथील बाजारातून रंग आणले जातात. त्यानंतर येथील व्यापारी घाऊक आणि किरकाेळ बाजारात त्याची विक्री करतात. बाजारामध्ये मागणी घटल्याने सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रंगामध्ये प्रामुख्याने नाॅन टाॅक्सीकलर हा महाग मिळताे. याचा दर साधारण किलाेला एक हजार ४०० रुपये किलाे आहे. त्याचप्रमाणे हर्बल कलर, गुलाल यांचे दर हे किलाेला सुमारे ६० ते ७० रुपये आहे. काही व्यापारी गेल्या वर्षींचा काही माल विकत आहेत, तर काहींनी नव्याने रंग विक्रीसाठी आणले आहेत.

तरुणाईचा नाराजीचा सूरकाही प्रमाणात किरकाेळ विक्री हाेत आहे; मात्र त्यातून नुकसान भरून निघणार नाही. काेराेनामुळे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रंग आणि पिचकाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. काेराेनामुळे आम्हाला मित्रमैत्रिणींसाेबत रंग खेळता येणार नाही. आता घरातच सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मज्जा करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया तरुणांमधून उमटत आहेत.

काेराेनाचा कहर सुरुवातीला जाणवत नव्हता त्यामुळे माेठ्या प्रमाणात माल मागविण्यात आला. आता काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने सर्व ठप्प झाले आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही किरकाेळ विक्री हाेते; मात्र माल पडून राहिल्याने नुकसान हाेणार आहे. - मनाेज भारती, व्यापारी, अलिबाग

टॅग्स :Holiहोळी