शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रंगांची साडेतीन काेटींची उलाढाल झाली ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:25 IST

काेराेनामुळे हाेळीचे रंग पडले फिके

आविष्कार देसाईरायगड : हाेळी आणि त्यापाठाेपाठ येणाऱ्या धुलिवंदन सणावर काेराेनाचे सावट पडले आहे. सार्वजनिक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर सण साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. यावर्षीही विविध रंगांना मागणी घटल्याने तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापारी चांगलेच हवालदिल झाले आहेत.

दरवर्षी हाेळी आणि धुलिवंदनाचा सण माेठ्या जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे; मात्र गेल्या वर्षी काेराेनाने घातलेला धुमाकूळ यावर्षीही सुरूच आहे. दिवसाला सुमारे ५०० रुग्ण सापडत असल्याने सरकारसह प्रशासानाची झाेप उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडणे मुश्कील हाेत आहे. धुळवड साजरी करताना रंगांची उधळ करण्यात येते. यासाठी बाजारात नेहमीप्रमाणे रंग विक्रीसाठी आले आहेत. मात्र,  सरकार आणि प्रशासनाने सण साजरे करण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रंग खेळण्यासाठी काेणीच बाहेर पडणार नाही. सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारातील रंगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. 

रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुंबई मशिद बंदर येथील बाजारातून रंग आणले जातात. त्यानंतर येथील व्यापारी घाऊक आणि किरकाेळ बाजारात त्याची विक्री करतात. बाजारामध्ये मागणी घटल्याने सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रंगामध्ये प्रामुख्याने नाॅन टाॅक्सीकलर हा महाग मिळताे. याचा दर साधारण किलाेला एक हजार ४०० रुपये किलाे आहे. त्याचप्रमाणे हर्बल कलर, गुलाल यांचे दर हे किलाेला सुमारे ६० ते ७० रुपये आहे. काही व्यापारी गेल्या वर्षींचा काही माल विकत आहेत, तर काहींनी नव्याने रंग विक्रीसाठी आणले आहेत.

तरुणाईचा नाराजीचा सूरकाही प्रमाणात किरकाेळ विक्री हाेत आहे; मात्र त्यातून नुकसान भरून निघणार नाही. काेराेनामुळे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रंग आणि पिचकाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. काेराेनामुळे आम्हाला मित्रमैत्रिणींसाेबत रंग खेळता येणार नाही. आता घरातच सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मज्जा करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया तरुणांमधून उमटत आहेत.

काेराेनाचा कहर सुरुवातीला जाणवत नव्हता त्यामुळे माेठ्या प्रमाणात माल मागविण्यात आला. आता काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने सर्व ठप्प झाले आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही किरकाेळ विक्री हाेते; मात्र माल पडून राहिल्याने नुकसान हाेणार आहे. - मनाेज भारती, व्यापारी, अलिबाग

टॅग्स :Holiहोळी