शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रंगांची साडेतीन काेटींची उलाढाल झाली ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:25 IST

काेराेनामुळे हाेळीचे रंग पडले फिके

आविष्कार देसाईरायगड : हाेळी आणि त्यापाठाेपाठ येणाऱ्या धुलिवंदन सणावर काेराेनाचे सावट पडले आहे. सार्वजनिक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर सण साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. यावर्षीही विविध रंगांना मागणी घटल्याने तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापारी चांगलेच हवालदिल झाले आहेत.

दरवर्षी हाेळी आणि धुलिवंदनाचा सण माेठ्या जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे; मात्र गेल्या वर्षी काेराेनाने घातलेला धुमाकूळ यावर्षीही सुरूच आहे. दिवसाला सुमारे ५०० रुग्ण सापडत असल्याने सरकारसह प्रशासानाची झाेप उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडणे मुश्कील हाेत आहे. धुळवड साजरी करताना रंगांची उधळ करण्यात येते. यासाठी बाजारात नेहमीप्रमाणे रंग विक्रीसाठी आले आहेत. मात्र,  सरकार आणि प्रशासनाने सण साजरे करण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रंग खेळण्यासाठी काेणीच बाहेर पडणार नाही. सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारातील रंगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. 

रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुंबई मशिद बंदर येथील बाजारातून रंग आणले जातात. त्यानंतर येथील व्यापारी घाऊक आणि किरकाेळ बाजारात त्याची विक्री करतात. बाजारामध्ये मागणी घटल्याने सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रंगामध्ये प्रामुख्याने नाॅन टाॅक्सीकलर हा महाग मिळताे. याचा दर साधारण किलाेला एक हजार ४०० रुपये किलाे आहे. त्याचप्रमाणे हर्बल कलर, गुलाल यांचे दर हे किलाेला सुमारे ६० ते ७० रुपये आहे. काही व्यापारी गेल्या वर्षींचा काही माल विकत आहेत, तर काहींनी नव्याने रंग विक्रीसाठी आणले आहेत.

तरुणाईचा नाराजीचा सूरकाही प्रमाणात किरकाेळ विक्री हाेत आहे; मात्र त्यातून नुकसान भरून निघणार नाही. काेराेनामुळे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रंग आणि पिचकाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. काेराेनामुळे आम्हाला मित्रमैत्रिणींसाेबत रंग खेळता येणार नाही. आता घरातच सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मज्जा करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया तरुणांमधून उमटत आहेत.

काेराेनाचा कहर सुरुवातीला जाणवत नव्हता त्यामुळे माेठ्या प्रमाणात माल मागविण्यात आला. आता काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने सर्व ठप्प झाले आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही किरकाेळ विक्री हाेते; मात्र माल पडून राहिल्याने नुकसान हाेणार आहे. - मनाेज भारती, व्यापारी, अलिबाग

टॅग्स :Holiहोळी