शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यात वणवे वाढले

By admin | Updated: March 11, 2017 02:21 IST

रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार

- जयंत धुळप,  अलिबागरायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार ३२५ हेक्टर वनक्षेत्र असून, या तीन जिल्ह्यात गतवर्षभरात ६८८ वणवे लागले आहेत. मात्र, हे वणवे वेळीच विझवण्यात वन विभागास यश आले असल्याची माहिती ठाणे वन विभागाचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गतवर्षभरात लागलेले हे ६८८ वणवे ४४७३.३१ हेक्टर क्षेत्रावर लागले होते. ठाणे वनपट्ट्यातील जंगले ही ‘शुष्क पानझडी वने’ या प्रकारात मोडतात. यामुळे याठिकाणचे वाळलेला पालापाचोळा तसेच गवत जळते. या वनपट्ट्यात येणाऱ्या रायगड, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यामध्ये भातशेती हे प्रमुख पीक आहे. सुका पालापाचोळा पेटवून शेतजमीन भाजण्याची ‘राबभाजणी’ ही पारंपरिक शेती मशागत पद्धती आहे. त्यामुळे देखील जंगलात व त्यालगतच्या भागात राब भाजणीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याचे लिमये यांनी स्पष्ट केली आहे.वणव्यांना आळा घालण्याकरिता वन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येतात. वणवा नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येते. १५ फेब्रुवारीपूर्वी जाळरेषा काढण्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. आग रक्षकांच्या मदतीने वणवा निदर्शनास येताच विझविण्याची कार्यवाही करण्यात येते.वर्षभरात लागलेल्या 688वणव्यांपैकी सर्वाधिक १८५ वणवे अलिबाग वन विभागात लागले आहेत. उर्वरित वन विभागात शहापूर वन विभागात १३८, रोहा वन विभागात १२८, ठाणे वन विभागात ११७, डहाणू वन विभागात ९० तर जव्हार वन विभागात ३० वणवे लागले आहेत.वणव्यांसाठी आधुनिक फायर ब्लोअर वणवे विझवण्याकरिता आधुनिक फायर ब्लोअर्सचा वापर करण्यात येतो. चालू वर्षात ४२ फायर ब्लोअर वनवणवा विझविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त फायर बिटर आणि फायर रॅक ही उपकरणे देखील देण्यात आली आहेत. सर्व वनपरिक्षेत्र स्तरावर गस्त वाहने उपलब्ध असून त्याचा वणवा नियंत्रणासाठी व गस्तीसाठी प्राधान्याने वापर करण्यात येत आहे.१५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समितीजंगलात लागणारे १०० टक्के वणवे हे मानवनिर्मित असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी वणव्यांना आळा घालण्याकरिता जनजागृती महत्त्वाची असल्याने ठाणे वनवृत्तात एकूण १५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती करून,वनवणवा नियंत्रणात त्यांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. गस्ती वाहनांचा वापर करून नागरिकांमध्ये वन वणव्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी विशेष गस्त मोहीम राबविण्यात येत आहे.ठाणे पट्ट्यातील सर्व उप वनसंरक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियामध्ये नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार तत्काळ वणवा नियंत्रणासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील प्रत्येक वनविभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.टोलफ्री हेल्पलाइन : हॅलो फॉरेस्ट १९२६ ही टोलफ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर प्राप्त वणव्याच्या संदेशांव्दारे तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील चार अधिक ाऱ्यांनी चंद्रपूर येथे वणवा नियंत्रण कार्यशाळेत सहभागी होवून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सहा वनविभागातील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वणवा नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिलेले आहे.