शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिल्ह्यात वणवे वाढले

By admin | Updated: March 11, 2017 02:21 IST

रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार

- जयंत धुळप,  अलिबागरायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार ३२५ हेक्टर वनक्षेत्र असून, या तीन जिल्ह्यात गतवर्षभरात ६८८ वणवे लागले आहेत. मात्र, हे वणवे वेळीच विझवण्यात वन विभागास यश आले असल्याची माहिती ठाणे वन विभागाचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गतवर्षभरात लागलेले हे ६८८ वणवे ४४७३.३१ हेक्टर क्षेत्रावर लागले होते. ठाणे वनपट्ट्यातील जंगले ही ‘शुष्क पानझडी वने’ या प्रकारात मोडतात. यामुळे याठिकाणचे वाळलेला पालापाचोळा तसेच गवत जळते. या वनपट्ट्यात येणाऱ्या रायगड, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यामध्ये भातशेती हे प्रमुख पीक आहे. सुका पालापाचोळा पेटवून शेतजमीन भाजण्याची ‘राबभाजणी’ ही पारंपरिक शेती मशागत पद्धती आहे. त्यामुळे देखील जंगलात व त्यालगतच्या भागात राब भाजणीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याचे लिमये यांनी स्पष्ट केली आहे.वणव्यांना आळा घालण्याकरिता वन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येतात. वणवा नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येते. १५ फेब्रुवारीपूर्वी जाळरेषा काढण्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. आग रक्षकांच्या मदतीने वणवा निदर्शनास येताच विझविण्याची कार्यवाही करण्यात येते.वर्षभरात लागलेल्या 688वणव्यांपैकी सर्वाधिक १८५ वणवे अलिबाग वन विभागात लागले आहेत. उर्वरित वन विभागात शहापूर वन विभागात १३८, रोहा वन विभागात १२८, ठाणे वन विभागात ११७, डहाणू वन विभागात ९० तर जव्हार वन विभागात ३० वणवे लागले आहेत.वणव्यांसाठी आधुनिक फायर ब्लोअर वणवे विझवण्याकरिता आधुनिक फायर ब्लोअर्सचा वापर करण्यात येतो. चालू वर्षात ४२ फायर ब्लोअर वनवणवा विझविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त फायर बिटर आणि फायर रॅक ही उपकरणे देखील देण्यात आली आहेत. सर्व वनपरिक्षेत्र स्तरावर गस्त वाहने उपलब्ध असून त्याचा वणवा नियंत्रणासाठी व गस्तीसाठी प्राधान्याने वापर करण्यात येत आहे.१५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समितीजंगलात लागणारे १०० टक्के वणवे हे मानवनिर्मित असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी वणव्यांना आळा घालण्याकरिता जनजागृती महत्त्वाची असल्याने ठाणे वनवृत्तात एकूण १५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती करून,वनवणवा नियंत्रणात त्यांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. गस्ती वाहनांचा वापर करून नागरिकांमध्ये वन वणव्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी विशेष गस्त मोहीम राबविण्यात येत आहे.ठाणे पट्ट्यातील सर्व उप वनसंरक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियामध्ये नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार तत्काळ वणवा नियंत्रणासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील प्रत्येक वनविभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.टोलफ्री हेल्पलाइन : हॅलो फॉरेस्ट १९२६ ही टोलफ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर प्राप्त वणव्याच्या संदेशांव्दारे तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील चार अधिक ाऱ्यांनी चंद्रपूर येथे वणवा नियंत्रण कार्यशाळेत सहभागी होवून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सहा वनविभागातील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वणवा नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिलेले आहे.