शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्ह्यात ४८ तासांत ३०१ मि.मी. पाऊस

By admin | Updated: June 10, 2017 01:14 IST

मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या ४८ तासांत जिल्ह्यात ३०१.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १८.८४ मि.मी. आहे. दरम्यान, जिल्ह्यात आगामी २४ तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ से.मी. ते १२ से.मी.), तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (१२ से.मी. ते २४ से.मी.) पाऊस पडण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याने जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्कतेचा इशारा सर्वत्र दिला आहे.अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका आदी सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गामधील अडथळे दूर करणे, आपत्कालीन प्रसंगी पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. मुरुडमधील मच्छीमार्केट परिसरात साचले पाणीआगरदांडा : मुरु ड येथे गेले दोन दिवस ८५ मि.मी. पाऊस कोसळल्याने शहरातील मच्छीमार्केट परिसरातील घरासमोर दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने तेथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या ठिकाणी परिसराला नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांना या पाण्यातून येण्या-जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.मुरु ड नगरपरिषदेच्या मार्फत कोळीवाड्यात अनेक ठिकाणी गटारांच्या कामासाठी खोदकाम चालू असून ती कामे अर्धवट आहेत. ही कामे लवकरात लवकर करावी, याकरिता सागरकन्या मच्छीमार सोसायटीतर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनात जी गटारांची कामे चालू आहेत ती पाऊस पडण्याच्या आत करावी, अन्यथा पाऊस आल्याने येथे पाणी साचून घरात येऊन आर्थिक नुकसान होईल, असे सुचविले होते. मात्र, या निवेदनाकडे फारसे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाइस चेअरमन तथा समाजसेवक मनोहर मकू यांनी सांगितले.