शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

जिल्ह्यात ४८ तासांत ३०१ मि.मी. पाऊस

By admin | Updated: June 10, 2017 01:14 IST

मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या ४८ तासांत जिल्ह्यात ३०१.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १८.८४ मि.मी. आहे. दरम्यान, जिल्ह्यात आगामी २४ तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ से.मी. ते १२ से.मी.), तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (१२ से.मी. ते २४ से.मी.) पाऊस पडण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याने जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्कतेचा इशारा सर्वत्र दिला आहे.अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका आदी सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गामधील अडथळे दूर करणे, आपत्कालीन प्रसंगी पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. मुरुडमधील मच्छीमार्केट परिसरात साचले पाणीआगरदांडा : मुरु ड येथे गेले दोन दिवस ८५ मि.मी. पाऊस कोसळल्याने शहरातील मच्छीमार्केट परिसरातील घरासमोर दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने तेथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या ठिकाणी परिसराला नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांना या पाण्यातून येण्या-जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.मुरु ड नगरपरिषदेच्या मार्फत कोळीवाड्यात अनेक ठिकाणी गटारांच्या कामासाठी खोदकाम चालू असून ती कामे अर्धवट आहेत. ही कामे लवकरात लवकर करावी, याकरिता सागरकन्या मच्छीमार सोसायटीतर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनात जी गटारांची कामे चालू आहेत ती पाऊस पडण्याच्या आत करावी, अन्यथा पाऊस आल्याने येथे पाणी साचून घरात येऊन आर्थिक नुकसान होईल, असे सुचविले होते. मात्र, या निवेदनाकडे फारसे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाइस चेअरमन तथा समाजसेवक मनोहर मकू यांनी सांगितले.