शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

तालुक्यात पोषण आहार वाटप ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:06 IST

खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार

अमोल पाटील खालापूर : खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिने उलटले आहे. तेव्हापासून आजतागायत तालुक्यातील पोषक आहाराचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील वाड्यावस्तीवर कुपोषणाची समस्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.खालापूर तालुक्यात चौक हद्दीतील तुपगाव येथील कारखान्यातून स्वयंसिद्धा महिला बचत गटामार्फत गरोदर व स्तनदा महिला व बालकांसाठी पोषक आहार पुरविण्यात येत होता. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचा पोषक आहार सीलबंद केला जात असल्याची माहिती खालापूर पंचायत समिती सभापती श्रद्धा साखरे यांना मिळाल्यानंतर २४ जानेवारीला रात्री सभापती साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, सहायक गटविकास अधिकारी पोळ, सुमित खेडेकर, एकात्मिक बालविकासचे चांदेकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या मदतीने तुपगाव येथील कारखान्यात पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी पोषक आहाराची १४६८ पाकिटे जवळपास चाळीस टक्के कमी वजनाची भरलेली आढळली. पोलिसांनी ५७,१०० रुपयांचा माल जप्त केला होता. त्यानंतर एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी जयपाल राजाराम गहाणे (५६) यांच्यासह आठ जणांना याप्रकरणी अटक झाली होती, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार सांभाळणारा महेंद्र गायकवाड हा फरारी आहे. पोषण आहार घोटाळ्यानंतर खालापूर तालुक्यातील(टीएचआर) घरपोच आहार योजना खंडित झाली असून बालके, गरोदर व स्तनदा माता यांची थाळी रिकामीच आहे. खालापूर तालुक्यात फेब्रुवारी २०१८ च्या आकडेवारीनुसार शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या ७४३६ असून त्यामध्ये ० ते ३ वर्षे वयाची ३७१८ बालके तर ३ ते ६ वर्षे वयाची देखील ३७१८ बालके असल्याची नोंद आहे. याशिवाय तालुक्यात गरोदर मातांची संख्या १५१५ असून स्तनदा मातांची संख्या १५१५ आहे. या सर्वांना गेल्या दोन महिन्यापासून पोषक आहाराचे वाटप झालेले नाही. याबाबत खालापुरातील एकात्मिक बालविकास कार्यालयात विचारणा केल्यानंतर पोषक आहार सुरू करण्यासाठी तीन वेळा जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पत्रव्यवहार केल्याची माहिती तेथील कर्मचारी बोरकर यांनी दिली. पोषक आहारात घोटाळा करणारे सध्या जामिनावर सुटले असले तरी आहार पुरवठा पूर्ववत झालेला नाही.