शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आॅनलाइन पद्धतीने धान्याचे वितरण: ८३ पीओएस मशिन्स बंद; १,३५८ दुकानांना दिल्या होत्या मशिन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 04:11 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्यांना आता आॅनलाइन पध्दतीने धान्याचे वितरण करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे

- आविष्कार देसाई ।अलिबाग : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्यांना आता आॅनलाइन पध्दतीने धान्याचे वितरण करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३५८ दुकानांना पुरवण्यात आलेल्या पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिन्सपैकी ८३ मशिन्स बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथील धान्य विक्र ी बंद पडली आहे.मुळातच रायगड जिल्ह्यामधील काही दुकानदारांनी आॅनलाइन धान्य विक्र ीला विरोध केला होता. त्यामुळे जिल्ह्यात निर्धारित वेळेनंतरच दुकानदारांनी आॅनलाइन धान्य विक्र ीला सुरु वात केल्याचे कोणीच नाकारू शकत नाही. प्राधान्य गटातील व अंत्योदय गटातील रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने धान्याची विक्र ी केली जाणार आहे. सरकारच्या ‘धान्यपूर्ती’ या संकेत स्थळावरदेखील याची माहिती आहे. रास्त भावात उपलब्ध करून दिल्या जाणाºया धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने पावले उचललीहोती.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत केले जाणारे रास्त भाव धान्य वितरण रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेशन दुकानदारांच्या विरोधामुळे हा उपक्र म सुरू होत नव्हता. आता मात्र सरकारने याची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.या संपूर्ण कामासाठी ओएएस कंपनीकडे जबाबदारी सोपवली आहे. इंटरनेट सुविधा, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या कंपनीची असणार आहे. प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानदाराकडे जे पॉइंट आॅफ सेल मशिन असेल. त्या मशिनमध्ये त्या दुकानाच्या अंतर्गत येणाºया प्रत्येक कुटुंबाची माहिती साठवून ठेवलेली असेल. त्या कुटुंबाला १२ अंकी ओळख क्र मांक दिला जाईल. हा क्र मांक टाकल्यावर मशिनवर कुटुंबातील प्रत्येकाचे नाव, त्यांना मिळणारे धान्य त्याची होणारी पूर्ण किंमत पटलावर येईल.कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्या मशिनवर अंगठा दाबल्यासच हे धान्य वितरीत करण्याची सुविधा मशिनमध्ये आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत मिळणार आहे. सध्या रोखीनेच हे धान्य विकण्यात येणार आहे. भविष्यात कॅशलेस विक्र ीदेखील करण्याची मुभा ग्राहकांना राहणार आहे.या धान्यविक्र ीची प्रत्येक दिवसाची नोंद आॅनलाइन पद्धतीने आपोआपच सरकार दरबारी होणार आहे. त्यामुळे दुकानदारांच्या व्यवहारावर करडी नजर राहणार आहे.रायगड जिल्ह्यात सुमारे एक हजार ३५८ रास्त भाव धान्य दुकाने आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ मिळणारी सुमारे ७७ हजार कुटुंबे तर, प्राधान्य गटाच्या ग्राहकांची संख्या सुमारे १४ लाख ४० हजार आहे. अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबाला दरमहा २५ किलो तांदूळ ३ रु पये प्रतिकिलो व १० किलो गहू २ रु पये प्रतिकिलो दराने पुरवला जातो. तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीमागे २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो.आॅफलाइनमुळेच रेशनिंगच्या धान्यामध्ये काळाबाजार केल्याच्या घटना उघड झाल्यानेच सरकारने यावर उपाय म्हणून धान्याचे वितरण आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता. लाभार्थ्यांच्या हिश्श्याचे धान्य काळाबाजारात विकून मलिदा मिळवण्याची सवय लागलेल्यांना आॅफलाइन हा चांगला पर्याय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मशिनमध्ये बिघाड करून आॅफलाइन पध्दतीने धान्य विकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेनेही सजग राहणे गरजेचे आहे.आॅफलाइन पध्दतीने धान्य विक्रीआता सर्व प्राधान्य गटातील व अंत्योदय गटातील रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने धान्याच्या विक्र ीला सुरु वात झाली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यासाठी सुमारे एक हजार ३५८ रास्तभाव धान्य दुकानासाठी पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी ८३ मशिन बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथील धान्य वितरणाला ब्रेक लागला आहे.लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आॅफलाइन पध्दतीने धान्य विक्र ीच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे दुफारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितेल. त्यांना मशिन्स बदलून देण्याची कार्यवाही सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.