शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कचरा रस्त्यात टाकणे पडणार महागात; पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार

By निखिल म्हात्रे | Updated: March 3, 2024 14:34 IST

रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता रस्त्यात कचरा टाकणे महागात पडणार आहे. त्या व्यक्तीविरोधात पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.याची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कचरा टाकताना सावधान बाळगा.

रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती, 54 प्राथमिक आरोग्य केंद्र, 288 हून अधिक आरोग्य उपकेंद्र आहेत. 2011 च्या जनगणनेनूसार जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी असून एक हजार 900हून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात वाढते पर्यटन व औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. गावांमध्ये लोकवस्ती वाढत असल्याने तेथील कचरा व अन्य सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला महागात पडत आहे. जिल्ह्यात कचरा भूमीचा अभाव असल्याने अनेक जण मिळेल त्याठिकाणी कचरा टाकत असतात. काही जण रस्त्याच्या कडेला, तर काही जण शेतांमध्ये कचरा टाकतात. तर काही जण घराच्या परिसराजवळ मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात.जिल्ह्यामध्ये वाढत्या पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे तारेवरची कसरत होऊ लागली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी मिशन विभागामार्फत स्वच्छता मोहिम ठिकठिकाणी राबविली जात आहे. कचरा मुक्तीसाठी त्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. परंतु नव्याचे नऊ दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम गावांतील मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्लास्टीक व अन्य कचरा जाळल्याने धुराचा धोका निर्माण होऊन प्रदुषण होण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे आता कचरा टाकणाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेने कडक पाऊल टाकण्याची मोहिम हाती घेतली आहे.मोठ्या शहरांध्ये ज्या पध्दतीने कचरा रस्त्यात टाकल्यावर पोलीसांमार्फत कारवाई केली जाते. त्या पध्दतीने जिल्ह्यात पोलीसांच्या मदतीने कारवाई होणार आहे. त्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार सुरुवातीला पोलीस व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठक घेतली जाणार आहे. गावागावात ठिकठिकाणी फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती यामाध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस ॲक्टनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता कचरा टाकताना जरा सावधानता बाळगा असे बोलले जात आहे.जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीदेखील काहीठिकाणी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी मिशन मोडवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सहीचे पत्र दिले जाणार आहे. पोलीसांच्या मदतीने कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

- शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारीस्वच्छता व पाणी मिशन, रायगड जिल्हा परिषद.