शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे तीन गावांत साथीचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:02 IST

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावात दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाबाची साथ सुरू आहे. आतापर्यंत ५० ते ६० ग्रामस्थांना साथीची लागण झाली असून दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे.

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आंबोली धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून गेल्या कित्येक वर्षांत ते काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याला दुर्गंध येत आहे. शिवाय वितरित होणारे पाणीही गढूळ असल्याने अनेकांना त्रास होऊ लागला आहे. आधी पोटदुखी आणि आता उलटी, जुलाबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. बहुतांश रुग्ण खासगी दवाखाने तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

परिसरात आगरदांडा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून, ते लांब पडत असल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराची लागण झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून आरोग्य खात्याकडून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असते, तर साथ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली नसती, असे मत ग्रामस्थ मंगेश पुलेकर यांनी व्यक्त केले.

मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी डोंगरी गावात भेट देऊन तेथील पाण्याची टाकी तपासणी केली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक गोष्टींची पूर्तता होण्याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत पत्रके काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे टीसीएल पावडर याचा उपयोग करण्याचे सांगण्यात आले आहे.

मुरुड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, त्यामुळे मुरुड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर मिळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीनही गावांत तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांना जास्त बाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत. साथ आटोक्यात असून सर्व डॉक्टर रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. येथील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.- डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका आरोग्य अधिकारीआंबोली धरणातून येणारे पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त आहे. आम्ही गावातील पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. सध्या आंबोली धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून चिंचघर धरणातून पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- मच्छींद्र नाईक, अध्यक्ष, डोंगरी 

टॅग्स :Waterपाणी