शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

दूषित पाण्यामुळे तीन गावांत साथीचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:02 IST

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावात दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाबाची साथ सुरू आहे. आतापर्यंत ५० ते ६० ग्रामस्थांना साथीची लागण झाली असून दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे.

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आंबोली धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून गेल्या कित्येक वर्षांत ते काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याला दुर्गंध येत आहे. शिवाय वितरित होणारे पाणीही गढूळ असल्याने अनेकांना त्रास होऊ लागला आहे. आधी पोटदुखी आणि आता उलटी, जुलाबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. बहुतांश रुग्ण खासगी दवाखाने तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

परिसरात आगरदांडा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून, ते लांब पडत असल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराची लागण झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून आरोग्य खात्याकडून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असते, तर साथ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली नसती, असे मत ग्रामस्थ मंगेश पुलेकर यांनी व्यक्त केले.

मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी डोंगरी गावात भेट देऊन तेथील पाण्याची टाकी तपासणी केली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक गोष्टींची पूर्तता होण्याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत पत्रके काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे टीसीएल पावडर याचा उपयोग करण्याचे सांगण्यात आले आहे.

मुरुड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, त्यामुळे मुरुड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर मिळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीनही गावांत तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांना जास्त बाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत. साथ आटोक्यात असून सर्व डॉक्टर रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. येथील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.- डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका आरोग्य अधिकारीआंबोली धरणातून येणारे पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त आहे. आम्ही गावातील पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. सध्या आंबोली धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून चिंचघर धरणातून पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- मच्छींद्र नाईक, अध्यक्ष, डोंगरी 

टॅग्स :Waterपाणी