शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:51 IST

२२ आॅगस्टपासून काम बंद : विविध मागण्या प्रलंबित

नेरळ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात क्रांतिदिनापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाने अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्याने २२ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्जत तालुक्यात ग्रामसेवकही आंदोलनात सहभागी झाले असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

कर्जत तालुक्यात ५१ ग्रामपंचायती असून, काही ग्रामसेवकांना दोन ग्रामपंचायतींसाठी नियुक्त करण्यात आले आहे. ४० हून अधिक ग्रामसेवक कर्जत पंचायत समितीच्या अंतर्गत आहेत; परंतु कर्जत तालुक्यातही हे आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामसेवकांमार्फत जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. मात्र, आज त्याच ग्रामसेवकांना प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. आमच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे.ग्रामीण जनतेपर्यंत आम्ही अनेक योजना पोहोचवत असतो. त्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. शासन ग्रामसेवकांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत.- प्रवीण पेमारे, अध्यक्ष,ग्रामसेवक युनियन, कर्जतआंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्रास व अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या गैरसोयीची जाणीव आहे. ग्रामसेवकांच्या मागण्याही रास्त आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार.- अशोक रौदळ,ग्रामसेवक, पोशीरग्रामसेवक ग्रामपंचायतीत येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विकासकामे करतानाही अडचणी येत आहेत. ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने ग्रामसेवकाचे ग्रामपंचायतीत स्थान महत्त्वाचे आहे. गेले अनेक दिवस आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे.- चिंधू तरे, सरपंच, ग्रामपंचायत, दहीवली

टॅग्स :Raigadरायगड