शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दिघी बंदर मूलभूत सुविधांपासून वंचित; जेट्टी मोडकळीस आल्याने मच्छीमारांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:18 IST

मंजूर प्रस्ताव अद्यापही प्रशासकीय मान्यतेच्या वाटेत

गणेश प्रभाळे दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या विकासासाठी निधी कधी प्राप्त होणार व प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याचीच प्रतीक्षा दिघीमधील मच्छीमारांना आहे. सद्यस्थितीत अनेक अडचणींना मच्छीमार सुविधांअभावी सामोरे जात आहेत, तर येथील जेट्टीच्या दुरवस्थेमुळे मच्छीमारांना त्रास सहन करावा लागत आहे.

दिघी ऐतिहासिक बंदर आहे. जंजिरा जलदुर्ग ते पूर्वी होणाऱ्या दळणवळणासह लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक यामुळे त्या काळात हे बंदर भरभराटीस आले होते. मोठा व्यापार बंदरातून चालत असे. साधारण १९६० पर्यंत या बंदरातून प्रवासी वाहतूक सुरू होती. आता लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक बंद पडली आहे आणि मच्छीमारी बंदर अशी ओळख या बंदराची बनली आहे. मात्र, येथील औद्योगिकीकरणामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत हे बंदर सापडले आहे. आता मच्छीमारी बंदर अशी या बंदराची ओळख असली, तरी मच्छीमारी बोटींसाठी या बंदरात असलेली जेट्टी शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे जेट्टीअभावी समुद्रकिनारी मासळी उतरविताना व बोटीत डिझेल, बर्फ चढविताना मच्छीमारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मासळी तर पाण्यातील दगडावर उतरविली जाते. गेली अनेक वर्षे मच्छीमारी बोटींसाठी जेट्टी बांधावी, अशी मागणी येथील मच्छीमार करीत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात येत आहेत. दिघी येथील मोडक्या स्थितीतील जेट्टीमुळे समुद्रातून आणलेल्या मच्छीला उतरवायला जागा मिळत नाही. उशीर झाला, तर मच्छी खराब होऊन अतिशय कमी भावात विकावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिघी येथील रहिवासी मंगेश गुणाजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बंदरातील समस्यांकडे कोणीच लक्ष देत नाही.दिघी बंदराला असणारी जुनी जेट्टी दिवसेंदिवस ढासळत आहे. पावसाळ्यातील उधाणाने त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात लाटांच्या तडाख्यामुळे ती आणखी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अर्धी अधिक जेट्टी तुटल्यामुळे समुद्राच्या उधाणाच्या लाटा बंदरात घुसण्याची भीती मच्छीमारांना आहे. त्यामुळे लाटांचे पाणी घुसून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बंदराचा विकास थांबला असून, मच्छीमारांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.बंदरातून २०० मच्छीमारी नौका ये-जा करतात. एकच तुटलेली जेट्टी असल्यामुळे एकाच वेळी एक किंवा दोन नौका धड लागत नाहीत. मच्छीमारांना जेट्टीवर विविध सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरच त्यांना बंदराचा फायदा होणार आहे. मात्र, अद्याप जेट्टीविषयी हालचाली झाल्या नाहीत. - बाळाराम खेळोजी, अध्यक्ष, कोळी समाज, दिघी

दिघी येथे प्रलंबित मासेमारी जेट्टीसाठी गती मिळावी. सध्या आम्हा कोळी लोकांना जेट्टीच्या दुरवस्थेमुळे मासेमारी व्यवसायात त्रास होत आहे. - गोविंद गुणाजी, माजी सरपंच दिघी.

सुविधायुक्त मासेमारी बंदर नसल्याने अडचण1. कोकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला, तरी सुविधायुक्त मासेमारी बंदरांची मात्र, कोकणात कमी आहे. रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.2. पण संपूर्ण जिल्ह्यात एकही सुसज्ज मासेमारी बंदर उपलब्ध नाही व त्यामुळे श्रीवर्धन मुरुडपासूनच्या मच्छीमारांना मासेविक्रीसाठी मुंबईतील बंदरापर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे. याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे. मासे उतरविण्यासाठीचे लँडिंग पॉइंट, मत्स्यप्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या बंदरामुळे रायगड जिल्ह्यातून मासे निर्यातीलाही प्रोत्साहन मिळू शकणार आहे.3. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मागणी असताना दिघी बंदराच्या विकासाच्या दृष्टीने तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. अनेक नेत्यांच्या पाठपुराव्याने दिघी कोळीवासीयांसाठी नवीन जेट्टी मंजूर झाली.4. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासेमारी जेट्टीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले. तेथून ते सर्वे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता होऊन मंजुरी मिळेल, असे मत्स्यआयुक्तालय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड