शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी शोधली वेगळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:26 IST

महाड तालुक्यातील तरुणांचा वेगळा आदर्श

सिकंदर अनवारे

दासगाव : गेली वर्षभर सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी यावर मात करण्यासाठी आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्यासाठी अनेक तरुण पुन्हा शेतीकडे वळले आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातून गावी आलेल्या आणि शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक तरुणांनी शेतीकडे पावले उचलली आहेत. महाडमधील काही तरुणांनी शेती करत त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविण्यात यश संपादन केले आहे.शिक्षण घेऊन देखील नोकरी नाही अशी अवस्था गेली काही वर्ष दिसून येत आहे. पदवीधर तरुणदेखील नोकरीच्या अपेक्षेने बसून आहेत. सातत्याने होत असलेल्या बदलामुळे नोकरी मिळणे देखील कठीण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रासह सरकारी नोकरभरती देखील होत नसल्याने तरुणांना मिळेल ते काम करावे लागत आहे. कोरोनामुळे राज्यात गतवर्षी बेरोजगारी २० टक्क्यांपर्यंत जावून पोहोचली होती. देशभरात सुमारे १२ कोटींच्यावर लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामध्ये तग धरून राहिला तो कृषी उद्योग. माणसाला लागणारे अन्न ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तयार होते ते कृषी क्षेत्राकडे तरुणांनी पुन्हा पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रातील मेहनतच तुम्हाला यश आणि पैसा मिळवून देणार हे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. यामुळे संचारबंदीमध्ये मुंबई, सुरत, पुणे आदी शहरातून गावी आलेल्या तरुणांनी पुन्हा शेती करण्याकडे भर दिला आहे.

महाडमधील पदवीधर तरुण हर्षल सुरेश कांबळे या तरुणाने संगणकीय पदवी घेतलेली असताना आणि घरात सुखसंपत्ती असतानादेखील आपल्याकडील पडिक जमिनीत त्याने भाजीपाला लागवड करत कोरोनामध्येदेखील उत्पादन मिळवले आहे. महाडमधील आकले गावात नदीकिनारी हर्षल सुरेश कांबळेच्या वडिलांच्या मालकीची जवळपास तीन एकर जमीन आहे. गेली अनेक वर्ष ही जमीन पडिक राहिली होती. नदीच्या पाण्याचा वापर करून या जमिनीत काही तरी केले पाहिजे या हेतूने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला त्याने गावातीलच महिला मजुरीने घेऊन जमिनीची मशागत करून घेतली आणि एका स्थानिक संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबवत विविध भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. आता हर्षल या जमिनीत स्वतः मेहनत घेत कोबी, वांगी, दुधी, मिरची. याचबरोबर त्याने गहू देखील पेरला आहे. महाडमध्ये आणि परिसरात ही भाजी विकली जाते शिवाय काही हॉटेलचालक देखील याठिकाणी येऊन लागणारी ताजी आणि पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तयार झालेली भाजी घेऊन जातात असे हर्षलने सांगितले.

शेतीला प्राधान्य देत पालेभाजी लागवडमहाड तालुक्यातील रावतळी विन्हेरे गावातील आशिष पवार हा तरुणदेखील कोरोनामुळे मुंबई सोडून आपल्या गावी आला. उपजीविका कशी करायची असा प्रश्न समोर असताना त्याने शेतीला प्राधान्य देत गावातील जमिनीवर पालेभाजी लागवड करण्यास सुरवात केली. पालेभाजीला असलेली मागणी लक्षात घेता आशिष पवार याने मुळा, माठ, याचबरोबर भेंडी, वांगी याची लागवड केली आहे. पालेभाजी स्वतः विक्रीकरिता महाड शहरात आशिष पवार आणत असल्याने ग्राहकांनादेखील ताजी भाजी मिळत आहे. मुंबई सोडल्यानंतर अनेकांना काय करायचे असा प्रश्न डोळ्यांसमोर असताना आशिष पवार यांनी एक वेगळाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. पालेभाजी लागवड करण्यापूर्वी आशिष पवार याने झेंडू फूल लागवड केली. 

टॅग्स :Raigadरायगड