शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी शोधली वेगळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:26 IST

महाड तालुक्यातील तरुणांचा वेगळा आदर्श

सिकंदर अनवारे

दासगाव : गेली वर्षभर सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी यावर मात करण्यासाठी आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्यासाठी अनेक तरुण पुन्हा शेतीकडे वळले आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातून गावी आलेल्या आणि शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक तरुणांनी शेतीकडे पावले उचलली आहेत. महाडमधील काही तरुणांनी शेती करत त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविण्यात यश संपादन केले आहे.शिक्षण घेऊन देखील नोकरी नाही अशी अवस्था गेली काही वर्ष दिसून येत आहे. पदवीधर तरुणदेखील नोकरीच्या अपेक्षेने बसून आहेत. सातत्याने होत असलेल्या बदलामुळे नोकरी मिळणे देखील कठीण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रासह सरकारी नोकरभरती देखील होत नसल्याने तरुणांना मिळेल ते काम करावे लागत आहे. कोरोनामुळे राज्यात गतवर्षी बेरोजगारी २० टक्क्यांपर्यंत जावून पोहोचली होती. देशभरात सुमारे १२ कोटींच्यावर लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामध्ये तग धरून राहिला तो कृषी उद्योग. माणसाला लागणारे अन्न ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तयार होते ते कृषी क्षेत्राकडे तरुणांनी पुन्हा पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रातील मेहनतच तुम्हाला यश आणि पैसा मिळवून देणार हे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. यामुळे संचारबंदीमध्ये मुंबई, सुरत, पुणे आदी शहरातून गावी आलेल्या तरुणांनी पुन्हा शेती करण्याकडे भर दिला आहे.

महाडमधील पदवीधर तरुण हर्षल सुरेश कांबळे या तरुणाने संगणकीय पदवी घेतलेली असताना आणि घरात सुखसंपत्ती असतानादेखील आपल्याकडील पडिक जमिनीत त्याने भाजीपाला लागवड करत कोरोनामध्येदेखील उत्पादन मिळवले आहे. महाडमधील आकले गावात नदीकिनारी हर्षल सुरेश कांबळेच्या वडिलांच्या मालकीची जवळपास तीन एकर जमीन आहे. गेली अनेक वर्ष ही जमीन पडिक राहिली होती. नदीच्या पाण्याचा वापर करून या जमिनीत काही तरी केले पाहिजे या हेतूने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला त्याने गावातीलच महिला मजुरीने घेऊन जमिनीची मशागत करून घेतली आणि एका स्थानिक संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबवत विविध भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. आता हर्षल या जमिनीत स्वतः मेहनत घेत कोबी, वांगी, दुधी, मिरची. याचबरोबर त्याने गहू देखील पेरला आहे. महाडमध्ये आणि परिसरात ही भाजी विकली जाते शिवाय काही हॉटेलचालक देखील याठिकाणी येऊन लागणारी ताजी आणि पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तयार झालेली भाजी घेऊन जातात असे हर्षलने सांगितले.

शेतीला प्राधान्य देत पालेभाजी लागवडमहाड तालुक्यातील रावतळी विन्हेरे गावातील आशिष पवार हा तरुणदेखील कोरोनामुळे मुंबई सोडून आपल्या गावी आला. उपजीविका कशी करायची असा प्रश्न समोर असताना त्याने शेतीला प्राधान्य देत गावातील जमिनीवर पालेभाजी लागवड करण्यास सुरवात केली. पालेभाजीला असलेली मागणी लक्षात घेता आशिष पवार याने मुळा, माठ, याचबरोबर भेंडी, वांगी याची लागवड केली आहे. पालेभाजी स्वतः विक्रीकरिता महाड शहरात आशिष पवार आणत असल्याने ग्राहकांनादेखील ताजी भाजी मिळत आहे. मुंबई सोडल्यानंतर अनेकांना काय करायचे असा प्रश्न डोळ्यांसमोर असताना आशिष पवार यांनी एक वेगळाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. पालेभाजी लागवड करण्यापूर्वी आशिष पवार याने झेंडू फूल लागवड केली. 

टॅग्स :Raigadरायगड