शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; खड्ड्यातील माती, खडी रस्त्यावर : चालकांसह नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:15 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे आधीच चालक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे.

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे आधीच चालक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे.गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात रस्ते माती आणि खडीने बुजवले होते. मात्र आता चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने आणि अवजड वाहतूकही सुरू झाल्याने महामार्गावर धुळीचे लोट पाहायला मिळत आहेत.गणेशोत्सवाच्या काळात सतत पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमधील माती ओली होवून ती घट्ट बसली होती. मात्र दोन-तीन दिवसांपासून कडकडीत ऊन पडल्यामुळे माती कोरडी झाली आहे. त्यातच अवजड वाहनांमुळे सर्वत्र धूळ उडत आहे. एखादे अवजड वाहन खड्ड्यातून आदळत गेल्यास धुळीचे लोट उडतात. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे फाटा ते पेणपर्यंत खड्डे पडलेल्या मार्गावर धुळीचे लोट दिसत आहेत. चारचाकी चालकाला याच त्रास होत नसला तरी दुचाकी चालकाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या धुळीमुळे डोळ्यांचे गंभीर आजार जडण्याची शक्यता नेत्र चिकित्सकांनी वर्तवली आहे. वाहन चालकासह बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. चिंचवन, कल्हे, पळस्पे, शिरढोण, बांधनवाडी पनवेलमधील या मार्गासह संपूर्ण गोवा रोडवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता या मार्गावर ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. यामुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. समोरील दिसत नसल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.