शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धोदानी बंधारा वाहू लागला

By admin | Updated: July 30, 2016 04:30 IST

राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला

अलिबाग : राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील बंधारा गतवर्षी बांधून पूर्ण झाला. यंदा त्यात सुमारे ३१.२१ टीएमसी जलसंचय झाला. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून आता वाहत असून एक किमी परिसरातील भूजल पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना २६ जानेवारी २०१५ रोजी कार्यान्वित केली. या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला. पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते झाली. आदिवासी लोकवस्तीच्या क्षेत्रातील धोदानी बंधाऱ्याकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते, परिणामी शासकीय यंत्रणा देखील येथे प्रभावीपणे कार्यरत होत्या.धोदानी परिसरातील गट क्र मांक ३, ४ व ५ मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. हा बंधारा केवळ ९.९८ लाख रु पये खर्चून अवघ्या ४१ दिवसात पूर्ण करण्यात आला. २६ जानेवारी २०१६ रोजी भूमिपूजन, २० फेबु्रवारी २०१५ रोजी प्रत्यक्ष कामास सुरु वात आणि ३१ मार्च २०१५ रोजी बंधाऱ्याच्या कामात अत्यंत गतिमानता येथे अनुभवास आली. बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी २० मीटर, उंची २.८० मीटर, पाणीसाठा उंची १.५ मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रु ंदी ०.६० मीटर अशी आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी बंधारा पूर्ण क्षमेतेने भरल्यावर तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण झाले व पाणी अडविले गेले. त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळजवळ २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला, फळपिके व चारापिके यांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिसराचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास प्रारंभ झाला.योजनेची उद्दिष्टे पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करु न पाणीपुरवठ्यात वाढ करणे.भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे वा वाढविणे.अस्तित्वातील जलस्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश या अभियानाचा आहे.