शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
2
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
3
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
4
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
5
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
6
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
7
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
8
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
9
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
10
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
11
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
12
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
13
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
14
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
15
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
16
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
17
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
18
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
19
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
20
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

धोदानी बंधारा वाहू लागला

By admin | Updated: July 30, 2016 04:30 IST

राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला

अलिबाग : राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील बंधारा गतवर्षी बांधून पूर्ण झाला. यंदा त्यात सुमारे ३१.२१ टीएमसी जलसंचय झाला. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून आता वाहत असून एक किमी परिसरातील भूजल पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना २६ जानेवारी २०१५ रोजी कार्यान्वित केली. या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला. पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते झाली. आदिवासी लोकवस्तीच्या क्षेत्रातील धोदानी बंधाऱ्याकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते, परिणामी शासकीय यंत्रणा देखील येथे प्रभावीपणे कार्यरत होत्या.धोदानी परिसरातील गट क्र मांक ३, ४ व ५ मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. हा बंधारा केवळ ९.९८ लाख रु पये खर्चून अवघ्या ४१ दिवसात पूर्ण करण्यात आला. २६ जानेवारी २०१६ रोजी भूमिपूजन, २० फेबु्रवारी २०१५ रोजी प्रत्यक्ष कामास सुरु वात आणि ३१ मार्च २०१५ रोजी बंधाऱ्याच्या कामात अत्यंत गतिमानता येथे अनुभवास आली. बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी २० मीटर, उंची २.८० मीटर, पाणीसाठा उंची १.५ मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रु ंदी ०.६० मीटर अशी आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी बंधारा पूर्ण क्षमेतेने भरल्यावर तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण झाले व पाणी अडविले गेले. त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळजवळ २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला, फळपिके व चारापिके यांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिसराचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास प्रारंभ झाला.योजनेची उद्दिष्टे पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करु न पाणीपुरवठ्यात वाढ करणे.भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे वा वाढविणे.अस्तित्वातील जलस्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश या अभियानाचा आहे.