शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
7
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
8
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
9
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
10
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
11
खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
12
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
13
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
14
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
15
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
17
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
18
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
19
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

धोदानी बंधारा वाहू लागला

By admin | Updated: July 30, 2016 04:30 IST

राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला

अलिबाग : राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील बंधारा गतवर्षी बांधून पूर्ण झाला. यंदा त्यात सुमारे ३१.२१ टीएमसी जलसंचय झाला. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून आता वाहत असून एक किमी परिसरातील भूजल पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना २६ जानेवारी २०१५ रोजी कार्यान्वित केली. या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला. पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते झाली. आदिवासी लोकवस्तीच्या क्षेत्रातील धोदानी बंधाऱ्याकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते, परिणामी शासकीय यंत्रणा देखील येथे प्रभावीपणे कार्यरत होत्या.धोदानी परिसरातील गट क्र मांक ३, ४ व ५ मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. हा बंधारा केवळ ९.९८ लाख रु पये खर्चून अवघ्या ४१ दिवसात पूर्ण करण्यात आला. २६ जानेवारी २०१६ रोजी भूमिपूजन, २० फेबु्रवारी २०१५ रोजी प्रत्यक्ष कामास सुरु वात आणि ३१ मार्च २०१५ रोजी बंधाऱ्याच्या कामात अत्यंत गतिमानता येथे अनुभवास आली. बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी २० मीटर, उंची २.८० मीटर, पाणीसाठा उंची १.५ मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रु ंदी ०.६० मीटर अशी आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी बंधारा पूर्ण क्षमेतेने भरल्यावर तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण झाले व पाणी अडविले गेले. त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळजवळ २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला, फळपिके व चारापिके यांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिसराचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास प्रारंभ झाला.योजनेची उद्दिष्टे पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करु न पाणीपुरवठ्यात वाढ करणे.भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे वा वाढविणे.अस्तित्वातील जलस्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश या अभियानाचा आहे.