शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

धनगरवाडीत निवाऱ्याचा प्रश्न कायम!

By admin | Updated: August 14, 2015 23:38 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होत आहेत, मात्र आजही माथेरानच्या कुशीत असलेल्या निगडीचीपट्टी या धनगर लोकांची वस्ती असलेल्या वाडीतील लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न कायम आहे.

कर्जत : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होत आहेत, मात्र आजही माथेरानच्या कुशीत असलेल्या निगडीचीपट्टी या धनगर लोकांची वस्ती असलेल्या वाडीतील लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न कायम आहे. दळी भूखंडाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून कर्जत उपविभागीय अधिकाऱ्यांनी लावलेली बैठक निर्णयाविना पूर्ण झाली.२००५ च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळणार म्हणून तेथून साडेतीन किलोमीटर अंतरावर नान्याचामाळ येथे निगडीच्यापट्टीचे लोक राहायला गेले. तेथील दळी जमिनीवर राहायला गेलेले धनगर लोक गेली अनेक वर्षे ते राहत असलेल्या दळी जमिनीची मागणी वन विभागाकडे करीत आहेत. निगडीचीपट्टी येथील रहिवाशी गणेश धाकू गोरे, गोविंद शिंगाडे, रामा जानू गोरे, गर्वेश शिंगाडे यांनी याबाबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर बोरकर यांनी खालापूरचे तहसीलदार, कर्जतचे वन अधिकारी आणि स्थानिक यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आदिवासी धनगर गणेश गोरे यांनी सर्व परिस्थिती कथन करून दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी वाडीमध्ये दिलेल्या भेटीत दळी जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती दिली. तसेच सध्या राहत असलेली नान्याचामाळ येथील जमीन दळी भूखंड असल्याने तो रीतसर सुपूर्द करण्याची मागणी केली. त्यावेळी वन अधिकारी घाडगे यांनी नान्याचामाळ येथील जमीन दळी भूखंड नसल्याची माहिती दिली. वन विभागाने तेथे एक महसूल खात्याचा १२ गुंठे क्षेत्र असलेला भूखंड असल्याची माहिती दिली.उपविभागीय अधिकारी बोरकर यांनी त्या भूखंडाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविता येईल, अशी भूमिका घेतली. त्यावर तो महसूल प्लॉट दरीमध्ये असल्याने कोणाच्याही फायद्याचा नसल्याची माहिती गोरे यांनी दिली. बोरकर यांनी खालापूरचे तहसीलदार कुंभार यांना सूचना देऊन बोरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणता सरकारी भूखंड असल्याची माहिती तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून घेण्याच्या सूचना केल्या. त्याची माहिती नान्याचामाळ येथे राहणाऱ्या आदिवासी धनगर लोकांना देण्याची सूचना केली. दुसरीकडे वन विभागाने देखील दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन एखादा दळी जमीन देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वनअधिकारी घाडगे यांना केल्या. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना उपविभागीय कार्यालयात लावलेली बैठक संपल्याने निगडीचीपट्टीच्या आदिवासी धनगर लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. देश स्वतंत्र झाला पण निगडीचीपट्टीचे आदिवासी अजूनही राहण्यासाठी हक्काचा निवारा, विजेचे दिवे, शाळा,पिण्याचे पाणी या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.(वार्ताहर)