शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खोरा बंदरातील विकासकामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 03:06 IST

सन २०१८ रोजी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदराच्या विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून या बंदरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली होती.

- संजय करडेमुरुड : सन २०१८ रोजी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदराच्या विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून या बंदरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली होती. कामाबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खोरा बंदरातील संरक्षक भिंत बांधणे, समुद्र किनाऱ्याभोवती दगडी आवरण करणे, बंदरातील गाळ काढणे, मुख्य बंदरावर पेव्हर ब्लॉक बसविणे, स्वछतागृह व प्रतीक्षालय इमारत आदी स्वरूपाची बांधकामे येथे पूर्ण करण्यात आली. ही सर्व कामे करत असताना खोरा बंदरातील वाहनतळाचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. त्याचप्रमाणे या बंदरावर विजेचे खांब नवीन बसविण्यात येणार होते, तेसुद्धा बसविण्यात आलेले नाही. पर्यटकांना बसण्यासाठी काँक्रीटच्या खुर्च्या बसविण्यात येणार होत्या, परंतु तेसुद्धा काम पूर्ण न करता संबंधित ठेकेदाराला बिल अदा केल्याने रखडलेली कामे पूर्ण होणार की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून कोट्यवधी रुपयांच्या बंदर विकासाची कामे केली जातात, परंतु ती पूर्ण न होता ठेकेदाराला बिल अदा करण्याची पद्धत बळावत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मेरीटाइम बोर्डाचे संपूर्ण कोकणासाठी कार्यकारी अभियंता हे एकमेव पद असून, कोकणातील सुरू असलेल्या या कामांवर एकच माणूस लक्ष देत असल्याने, ज्यावेळी प्रत्यक्ष काम सुरू असते, त्यावेळी या ठिकाणी कोणताही अभियंता उपस्थित नसतो. ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करतो. तद्नंतर ते काम पाहावयास कार्यकारी अभियंता येतात व बिल काढण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा या प्रक्रियेमुळे असंख्य कामे प्रलंबित राहिल्याने ठेकेदाराविषयी स्थांनिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुरुड येथील खोरा बंदरातील वाहनतळाचे काम राखडल्यामुळे पर्यटकांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.पावसाळा संपला तरी मुहूर्त नाही१याबाबत काही दिवसापूर्वी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी खोरा बंदरातील वाहनतळ व रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता, पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे जिरले, तर काँक्रीट चांगल्या पद्धतीने होऊन ते चिरकाल टिकते.२पावसाळा संपताच तातडीने वाहन तळाचे काम सुरू करू अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती, परंतु आज पावसाळा संपून दोन महिने झाले, तरी खोरा बंदरातील वाहनतळाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.३याबाबत पुन्हा विचारणा के ली असता लवरकरच काम सुरू होईल असे ते म्हणाले. मात्र,डिसेंबर महिन्यात नाताळाच्या सुट्ट्या असल्याने असंख्य पर्यटक या ठिकाणी येणार आहेत. अशातच वाहनतळाचे काम पूर्ण न झाल्याने पर्यटकांना रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या कराव्या लागणार आहेत.४त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूककोंडी होणार आहे, परंतु या परिस्थितीकडे कार्यकारी अभियंता देवरे हे गांभीर्यपूर्वक घेत नसल्याने, सदरील वाहनतळाचे काम खूप महिन्यांपासून आहे त्या स्थितीत आहे.

टॅग्स :Raigadरायगड