शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निधी असूनही काम नाही

By admin | Updated: October 8, 2015 23:33 IST

रायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेला निधी त्यांच्याकडून खर्च झालेला नाही. ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे एक कोटी २७ लाख २४ हजार ७५५ रुपयांचा निधी परत घेण्याची नामुष्की रायगड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेने निधी परत घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे.संपूर्ण स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. यासाठी सरकारकडून दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांच्या निधीचीही तरतूद झाली. गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित निधी वर्ग करण्यात आला होता. त्यांनी ४० टक्के निधी वर्गही केला होता. मात्र ग्रामपंचायतींनी कमीअधिक प्रमाणात निधी खर्च केला. शोष खड्डे, लिचपीट, गांडुळखत प्रकल्पासाठी शेडचे बांधकाम या निधीच्या माध्यमातून करायचे होते. मात्र ग्रामपंचायतींनी कामांमध्ये सातत्य ठेवले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी आपल्या अजेंड्यावर अद्यापही कचरा व्यवस्थापन हा विषय घेतला नसल्याने निधी प्राप्त होऊनही त्यावर चांगले काम होऊ शकले नसल्याने निधी काढून घ्यावा लागत आहे. ग्रामपंचायतींना निधी देऊनही त्यांनी तो खर्च केलेला नाही. निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबतचे पत्र संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या ग्रामपंचायतींनी काम केले नाही त्यांना समज देण्यात आली असल्याचेही साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले.पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायती : स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. तालुका ग्रा.पं.निधी खर्चमाणगाव ०७४४,९५,९४४ १७,९८,३७५अलिबाग ०३९,८३,७६१३,९३,५०४महाड०३१८,५६,६७२७,४२,६६८कर्जत ०२१६,५८,२४०६,६३,२९६तळा ०१७,९९,३२०३,१९,७२८खालापूर०१६,४०,०००२,५६,०००पनवेल०३१२,८०,०००५,१२,०००पेण ०३१८,०७,१८१७,२२,८७२श्रीवर्धन ०४२५,४६,२१६१२,१०,४८४मुरुड०२१५,९०,५२०६,३६,२०८म्हसळा०१५,९०,०७०२,३६,०२८रोहे ०२६,४०,०००२,५६,०००उरण०२१०,४०,०००४,१६,०००सुधागड ०१६,४०,०००२,५६,०००पोलादपूर ०१६,४०,०००, २,५६,०००