शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली, भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:12 IST

हमीभाव न मिळाल्याने कांदा अनेकदा शेतक-यांच्या डोळ््यात पाणी आणतो, तर भाव वाढला की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते.

जयंत धुळप  अलिबाग : हमीभाव न मिळाल्याने कांदा अनेकदा शेतक-यांच्या डोळ््यात पाणी आणतो, तर भाव वाढला की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. पण रायगड जिल्ह्यातील विशेषत: अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. चवीला गोड आणि औषधी गुणधर्मामुळे सध्या पांढरा कांद्याची ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. चांगल्या बाजारभावामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकरीही सुखावले आहेत.अलिबागकडून पेणला जाताना रस्त्याच्या दुतर्फा सध्या पांढºया कांद्यांच्या माळांनी बाजारपेठ काबीज केली आहे. आम्लपित्तावर अत्यंत गुणकारी, पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करणारा, गोड, रु चकर अशी या कांद्याची खासियत आहे.लाल कांदा बाजारात सुटा उपलब्ध असतो, परंतु पांढºया कांद्याच्या विणलेल्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या माळा घरात एक बाजूला हवेशीर बांधून ठेवल्या की त्या वर्षभर टिकतात. सध्या मोठ्या पांढºया कांद्याची माळ १६० रुपयांना तर लहान पांढºया कांद्याची माळ १२५ रुपयांना विकली जात आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अन्य भागातही पांढºया कांद्याचे उत्पादन होते, परंतु अलिबाग तालुक्यात लागवड होणाºया पांढºया कांद्याची चव, गुणधर्म वेगळेच असून किमतीतही फरक आहे. कोकणात येणारे प्रवासी, पर्यटक, मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारे प्रवासी आवर्जून गाडी थांबवून कांद्याच्या माळ खरेदी करताना दिसतात.तालुक्यात २३० हेक्टरवर पांढºया कांद्याची लागवडअलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, पवेळे, सहाण व ढवर या गावांमध्ये हा पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात होतो. पूर्वी फक्त अलिबाग तालुक्यातच या कांद्याची लागवड केली जात असे. मात्र आता पेण, महाड, रोहा, माणगाव, कर्जत या तालुक्यांमध्ये शेतकºयांनी या पांढºया कांद्याची लागवड सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पांढºया कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अलिबाग तालुक्यात २३० हेक्टर आहे.गादी वाफा पद्धतीने लागवड१खरिपातील भाताची कापणी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पांढºया कांद्याची लागवड शेतातील नैसर्गिक ओलाव्यावर शेतकरी करतात. अडीच ते तीन महिन्यांत पांढºया कांद्याचे पीक तयार होते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक असे कांद्याचे सूत्र शेतकरी सांगतात. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. याबाबत कृषी विभागामार्फत शेतकºयांना वेळोवेळी माहिती देत असल्याने बरेच शेतकरी आता गादी वाफा पद्धतीने कांदा लागवडीकडे वळत आहेत. या पद्धतीने कांदा लागवड केल्यामुळे कांद्याचा आकार मोठा होतो. साहजिकच चांगला भाव मिळतो. कृषी विभागाकडून उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपक्र म राबविले जात आहेत.बियाणांची निर्मिती अपेक्षित२कांद्याची लागवड अद्याप पारंपरिक पद्धतीने आणि मर्यादित स्वरूपातच होते आहे. पांढºया कांद्याची लागवड सहकारी व्यावसायिक तत्त्वावर केल्यास अधिक शेतकºयांना आर्थिक लाभ होवू शकतो. त्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून पांढºया कांद्याच्या बियाणांची निर्मिती आणि पाऊस थांबल्यावर शेतकºयांना बियाणे उपलब्ध करून दिल्यास, हा पांढरा कांदा रायगडमधील शेतकºयांच्या आर्थिक परिवर्तन करेल, असा विश्वास कांदा उत्पादक शेतकºयांचा आहे.