शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:20 IST

रोहा येथे पत्रकार परिषद : विरोधकांच्या प्रश्नांना प्रतिउत्तर; पुनर्वसनासाठी नुकसानीचा आराखडा लवकरच

रोहा : निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड, दिवेआगर, श्रीवर्धन, म्हसळा भागात बसला. शेकडो एकर फळबागा उद्ध्वस्त झाल्या. रोहा, मुरूड, अलिबाग, पेण तालुक्यातही अतोनात नुकसान झाले. घरे, शाळा, शासकीय इमारती, हाउसिंग सोसायटींचे पत्रे उडून सामान्य कुटुंबे उघड्यावर आली. त्या सर्वांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. त्यासाठी नुकसानीचा आराखडा लवकरात लवकर तयार केला जाईल. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. त्यापाठोपाठ लगेचच तातडीची मदत देण्याचे काम सुरू होईल. रॉकेल, धान्यवाटप सुरू आहे. मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्यासाठी मदतीची स्वतंत्र मागणी केली आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यांनी सातारा, सांगली महापुरात जेवढी मदत केली, तो जीआर समोर ठेवा. त्यापेक्षा आघाडी सरकार सरस मदत करेल, असा भाजपला चिमटा काढत खा. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.

खा. सुनील तटकरे यांनी निसर्ग वादळाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रोहा येथे शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. प्रारंभी दक्षिण रायगड अंशत: कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे समाधान खा. तटकरे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या धर्तीवर केंद्राने जाहीर केलेली विविध मदत अद्याप महाराष्ट्रात पोहोचली नाही. त्याबाबत संसदेत केंद्र सरकारला जाब विचारू, असे खासदार तटकरे यांनी सांगितले. वादळाच्या पूर्वसंध्येला प्रशासन, सरकारने उत्तम नियोजन केले. जीवितहानी टाळता आली. तरीही प्रशासनाने काही बाबतीत दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. प्रथम रस्ते मोकळे केले. श्रीवर्धन, दिवेआगर अक्षरश: उद्ध्वस्त झाले. वादळात सर्वच तालुक्यांत मोठे नुकसान झाले. फळबागा नष्ट झाल्या, घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्या सर्व बाधितांना योग्य भरपाईसाठी आग्रही आहे. नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांपाठोपाठ खा. शरद पवार यांनी पाहणी केली. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती आली. मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी केली आहे, असेही तटकरे यांनी त्या वेळी सांगितले. या वेळी आ. अनिकेत तटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.रायगडला केंद्र सरकार मदत का देत नाही? : जिल्ह्यातील अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यांना जुन्या रोहयोअंतर्गत पुनर्जीवित करण्याची तत्त्वत: मान्यता मिळाली. तातडीने पंचनामे झाले पाहिजेत. सर्वच वस्तुनिष्ठ भरपाई दिली जाईल. भरपाई प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार. राष्ट्रीयीकृत बँकांनी लोकांना त्रास दिले हे निषेधार्ह आहे. तसेच काही व्यापारी वाढीव दराने पत्रे, पाइप विकत असल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले. पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसला. त्यांचे व्याज माफ करावे, अशी मागणी करणार आहे. वादळाची दखल केंद्राने घेतली, मात्र केंद्राची आपत्ती व्यावस्थापन टीम अजून आलेली नाही. अजून मदत मिळण्याचे संकेत नाहीत. रायगडला केंद्र सरकार मदत का देत नाही, हे त्यांनी आधी केंद्राला सांगावे, मग टीका करावी, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी रायगडचा वादळ दौरा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना लगावला.

टॅग्स :Raigadरायगड