शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

जमिनीच्या मोबदल्यात वारसांना जिल्हा परिषदेत काम देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:16 IST

जमीन बक्षीसपत्र; सोळा वर्षे शासन दरबारी नारायण पवार मारताहेत फेऱ्या

दासगाव : ऐतिहासिक पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ सभागृहाकरिता नारायण पवार यांनी आपली रस्त्याकडेला असलेली जागा घरातील मुलांपैकी कोणालाही जिल्हा परिषदेत सामावून घेण्याच्या तोंडी आश्वासनावर जिल्हा परिषदेला बक्षीसपत्र केली. मात्र गेली सोळा वर्षे नारायण बाबू पवार हे शासन दरबारी फेऱ्या मारूनदेखील प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पवार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत.

पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शेजारीच जिल्हा परिषदेच्या मार्फत जिजाऊ यांच्या नावाने सभागृह बांधण्यात आले आहे. शिवाय या सभागृहाजवळ प्राथमिक मराठी शाळादेखील आहे. सभागृह आणि मराठी शाळा ज्या जागेत उभी आहे त्या जागेतील १० गुंठे जागा पाचाडमधील नारायण बाबू पवार यांनी सभागृह आणि शाळेकरिता दिली आहे. तत्कालीन आमदार माणिक जगताप आणि स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेतून फक्त दहा गुंठे जागा देण्याचे ठरले. मात्र प्रत्यक्षात १० गुंठ्याहून अधिक जमीन या ठिकाणी व्यापली गेली आहे. यामुळे दहा गुंठे जागा वगळून इतर जमीन मला परत करावी किंवा वारसांना कामावर घेण्याचे तोंडी ठरल्याप्रमाणे कामावर घेतले जावे, अशी मागणी नारायण बाबू पवार हे वृद्ध ग्रामस्थ करीत आहेत. हा पाठपुरावा त्यांनी जवळपास २००५ पासून सुरू केला आहे. सध्या या जागेत राजमाता जिजाऊ सभागृह आणि प्राथमिक मराठी शाळा उभी आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी स्थानिक प्रशासनापासून ते आमदार, खासदारांपर्यंत पत्रव्यवहार केला, मात्र कोणीही नारायण पवार यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.ग्रामस्थांच्या बैठकीत मान्य केलेली मागणी पूर्ण केली जावी शिवाय जेवढी जागा बक्षीसपत्र केली आहे त्यापेक्षा अधिक जागा व्यापली गेल्याने बाकीची जागा परत करण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. नारायण पवार हे आता वयोवृद्ध असल्याने किमान आपल्या वारसांना तरी या जागेचा मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दाद देत नसल्याने त्यांच्यासमोर मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण कुटुंब आमरण उपोषण करू, असा इशारा नारायण पवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

माझ्या वडिलांनी गेली वीस वर्षे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना न्यायाची विनंती केली, मात्र आजतागायत देण्यात आलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. आमच्या मागणीकडे रायगड जिल्हा परिषद दुर्लक्ष करत आहे.- दीपिका पवार, मुलगी 

सदर प्रकरण जुने असून, याची पूर्ण माहिती घेऊन किंवा संबंधित शेतकऱ्याने पुन्हा मागणी अर्ज केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी अर्जाचा पाठपुरावा केला जाईल.-नरेंद्र देशमुख, बांधकाम अभियंता, जिल्हा परिषद, महाड.  

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड