शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:06 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते.

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पाची किंमत ९४२.६९ कोटीचा करारनामा २९ जानेवारी २0११ रोजी झाला होता. त्यानुसार १३ जून २0१४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे होते. आज २०१८ साल उजाडले, मात्र काम काही पूर्ण झाले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. भरत गोगावले यांनी नमूद केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे व रस्त्याच्या डागडुजीचे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या टप्प्यामधील पळस्पे ते वडखळमधील काम सुप्रीम कंपनीकडून काढून ते जे.एम. म्हात्रे कंपनीला देण्यात आल्याने या पहिल्या टप्प्यातील कामाची प्रगती आहे. मात्र वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. पुलाची कामे अर्धवट अवस्थेत तर आहेतच पण १ किमी देखील रस्ता व्यवस्थित नाही. वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूककोंडी व अपघाताचे सत्र चालूच आहेत.राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी पावसाळ्यापूर्वी न केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गोगावले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ मधील वडखळ ते इंदापूर या रस्त्याच्या दुरवस्थेला (एन.एच.ए.आय.) नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया हेच जबाबदार आहेत असा आक्षेप घेवून वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे सांगितले. ४ वर्षांपासून डोंगरातील माती रस्त्यावर वाहून येणे, पावसाळ्यात रस्त्यात गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात असे नमूद करून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली का? असेही म्हटले आहे. रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या प्राधिकरणाला निर्देश द्यावे अशी मागणी आ. गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.