शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:06 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते.

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पाची किंमत ९४२.६९ कोटीचा करारनामा २९ जानेवारी २0११ रोजी झाला होता. त्यानुसार १३ जून २0१४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे होते. आज २०१८ साल उजाडले, मात्र काम काही पूर्ण झाले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. भरत गोगावले यांनी नमूद केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे व रस्त्याच्या डागडुजीचे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या टप्प्यामधील पळस्पे ते वडखळमधील काम सुप्रीम कंपनीकडून काढून ते जे.एम. म्हात्रे कंपनीला देण्यात आल्याने या पहिल्या टप्प्यातील कामाची प्रगती आहे. मात्र वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. पुलाची कामे अर्धवट अवस्थेत तर आहेतच पण १ किमी देखील रस्ता व्यवस्थित नाही. वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूककोंडी व अपघाताचे सत्र चालूच आहेत.राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी पावसाळ्यापूर्वी न केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गोगावले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ मधील वडखळ ते इंदापूर या रस्त्याच्या दुरवस्थेला (एन.एच.ए.आय.) नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया हेच जबाबदार आहेत असा आक्षेप घेवून वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे सांगितले. ४ वर्षांपासून डोंगरातील माती रस्त्यावर वाहून येणे, पावसाळ्यात रस्त्यात गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात असे नमूद करून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली का? असेही म्हटले आहे. रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या प्राधिकरणाला निर्देश द्यावे अशी मागणी आ. गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.