शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी एसटीचा मार्ग बदलण्याची मागणी

By admin | Updated: June 15, 2017 02:44 IST

शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा प्रवासाचा त्रास कमी होण्यासाठी आणि गावातील विद्यार्थी वेळेत घरी यावे, यासाठी महाड तालुक्यातील आदिसते गावासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा प्रवासाचा त्रास कमी होण्यासाठी आणि गावातील विद्यार्थी वेळेत घरी यावे, यासाठी महाड तालुक्यातील आदिसते गावासाठी जाणाऱ्या एसटी गाडीच्या वेळापत्रक आणि मार्ग बदलण्याची मागणी आदिसते ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसभेतील ठरावाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील आदिसते हे गाव दुर्गम गावाच्या यादीतील गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेल्या या गावासाठी महाड आगारातून एकच बस जाते. ही बस आंबिवली, मुमुर्शी, पिंपळकोंड ही गाव करत पुढे आदिसत्याला जाते. एसटीच्या या मार्गामुळे या गाडीचा फायदा येथील विद्यार्थ्यांनाही होत नाही. जवळपास ८० विद्यार्थी या गाडीवर अवलंबून असतात. या एसटीने प्रवास करायचा म्हटला तर विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना विनाकारण वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे आदिसते गावात जाणारी एसटी गाडी असली तरी तिचा कोणताच फायदा येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना होत नाही. यासाठी महाड ते आदिसते अशी थेट एसटी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.३१ मे रोजी आदिसते ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत एसटीचे वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यासंबंधी तक्रार अरविंद जाधव या ग्रामस्थाने के ली होती, हा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एसटीचे वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यास ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याची जाणीव करून देत ही मागणी केली आहे. मार्ग बदललेल्या या गाडीमुळे रोहन, विठ्ठलवाडी, वळंग बौद्धवाडी, खैरे सुतारे कोंड आदि गावातील विद्यार्थी, ग्रामस्थांना फायदा होणार आहे. नव्याने सुरू होणारी ही गाडी सकाळी ९.३० वाजता आणि संध्याकाळी ४.३० वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी देखील या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.चुकीच्या मार्गामुळे पायपीटआदिसते गावाला जाणारी एसटी गाडी आंबिवली, मुमुर्शी, पिंपळकोंड, मार्गे आदिसत्याला जाते. या मार्गामुळे अनेक ग्रामस्थ आणि विद्यार्थी तुडील फाट्यावर गाडीतून खाली उतरतात. महाडला येणाऱ्यांना इतर कोणत्याही वाहनाचा आधार मिळतो. मात्र आदिसते गावाला जाणाऱ्यांना या गाडीची वाट बघत तासन्तास तुडील फाटा येथे तिष्ठत बसावे लागते. अनेकदा गाडी न आल्याने रस्त्यात अडकून पडलेल्या या प्रवाशांना पायपिटीचा त्रास सहन करावा लागतो.