शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 04:07 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.सरकारने यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्षरोपणाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी, तसेच ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत झाडे पुरवण्यात येत आहेत.कर्जत तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायतीला वारे व परिसरातील वाड्या-पाड्यांवर, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा परिसरात झाडे लावण्यासाठी या विभागाकडून सुमारे १२०० रोपे देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीकडून त्या रोपांची लागवड न करता रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. त्यामुळे वारे ग्रामपंचायतीला वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याची चर्चा सर्वत्रआहे.शासनाकडून दरवर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रु पये खर्च केले जातात. वृक्षतोडीमुळे निसर्गाची होत असलेली हानी, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जातआहेत.राज्यभरात शासनाच्या विविध विभागांकडून, सामाजिक संस्थांकडून वृक्षरोपणाचे कार्यक्र म केले जातात; परंतु शासनाच्या या संकल्पनेलाच, वारे ग्रामपंचायतीकडून हरताळ फासल्याचे रस्त्यावर टाकलेल्या रोपांकडे पाहता दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या