शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:41 IST

सुनील तटकरे यांनी केली मुरुड तालुका नाखवा संघाबरोबर चर्चा

आगरदांडा : मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी मत्स्य विकासमंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली आहे. नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी तिथे यावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टीबाबतचा निर्णय होईल. मच्छीमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या जेट्टीबाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्यमंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल, असे अभिवाचन खासदार तटकरे यांनी मुरुड तालुका नाखवा संघाला दिले.अगरदांडा बंदरात मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी जेट्टी मिळावी, या आपल्या प्रमुख मागणीसाठी राजपुरी दिघी, एकदरा व मुरुड परिसरातील सर्व नाखवा मंडळी एकत्र येत, मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मासळीची मोठे मार्केट बंद असल्याने मच्छीमारांना आपली मासळी विकता येत नव्हती, त्यामुळे आम्हाला आगारदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेट्टी बांधून मिळावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मोठे सागरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सोमवारी आगरदांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जेट्टीची पाहणी केली.यावेळी मच्छीमारांनी आपली समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी आगरदांडा जेट्टी ही मच्छीमारांसाठी योग्य व सुरक्षित असून, आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छीमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी. कारण समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने, पकडलेली मासळी वाया जात असल्याचे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे, नारायण गोलान, धुरवा लोदी, चेअरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी, तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोळी समाजाने फेडरेशन तयार करावेरायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, तातडीने जेट्टी जरी मंजूर केली, तरी याला दीड वर्ष तरी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छीमारांना कायमस्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे, मासळीला वाढती मागणी असून, शीतगृहसुद्धा विकसित करता आले पाहिजे,कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे, मासेमारीबरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधनेसुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेसुद्धा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे खा.सुनील तटकरे म्हणाले.