शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:41 IST

सुनील तटकरे यांनी केली मुरुड तालुका नाखवा संघाबरोबर चर्चा

आगरदांडा : मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी मत्स्य विकासमंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली आहे. नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी तिथे यावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टीबाबतचा निर्णय होईल. मच्छीमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या जेट्टीबाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्यमंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल, असे अभिवाचन खासदार तटकरे यांनी मुरुड तालुका नाखवा संघाला दिले.अगरदांडा बंदरात मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी जेट्टी मिळावी, या आपल्या प्रमुख मागणीसाठी राजपुरी दिघी, एकदरा व मुरुड परिसरातील सर्व नाखवा मंडळी एकत्र येत, मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मासळीची मोठे मार्केट बंद असल्याने मच्छीमारांना आपली मासळी विकता येत नव्हती, त्यामुळे आम्हाला आगारदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेट्टी बांधून मिळावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मोठे सागरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सोमवारी आगरदांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जेट्टीची पाहणी केली.यावेळी मच्छीमारांनी आपली समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी आगरदांडा जेट्टी ही मच्छीमारांसाठी योग्य व सुरक्षित असून, आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छीमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी. कारण समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने, पकडलेली मासळी वाया जात असल्याचे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे, नारायण गोलान, धुरवा लोदी, चेअरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी, तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोळी समाजाने फेडरेशन तयार करावेरायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, तातडीने जेट्टी जरी मंजूर केली, तरी याला दीड वर्ष तरी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छीमारांना कायमस्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे, मासळीला वाढती मागणी असून, शीतगृहसुद्धा विकसित करता आले पाहिजे,कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे, मासेमारीबरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधनेसुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेसुद्धा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे खा.सुनील तटकरे म्हणाले.