शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दासगाव-वीर दरम्यान रखडले महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 02:33 IST

वन विभागाच्या जमिनीचा अडथळा : प्रस्ताव पाठवला परत

सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू असले तरी दासगाव आणि वीर दरम्यान असलेल्या वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीमुळे या पट्ट्यातील काम रखडले आहे. वन विभागाने येथील काम करण्यास सपशेल नकार दिला आहे. महामार्ग विभागाने पाठवलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव वन विभागाने परत पाठवला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यास प्रांत कार्यालय आणि महामार्ग विभाग टाळाटाळ करत आहेत.

मुंबई- गोवा महामार्ग क्र मांक ६६ चे चौपदरीकरण सध्या सुरू आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यान आणि कशेडी ते पुढे हे काम प्रगतिपथावर सुरू आहे. महाड तालुक्यातील दासगाव आणि वीर या दोन गावांच्या दरम्यान वन विभागाच्या जमिनी आहेत. यामुळे केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय येथे काम करता येणे शक्य नाही. दासगाव आणि वीर दरम्यान जवळपास २० हेक्टर परिसरातील वन विभागाच्या मालकीची ४२ गुंठे जमीन तर इतर खाजगी वन जमिनींचा समावेश आहे. दासगावमधील १० सातबारा तर वीरमधील ९ सातबारा वन विभागाच्या नोंदी असलेले आहेत. यामुळे येथे पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र महामार्ग विभाग आणि प्रांत कार्यालय हा विषय गंभीरपणे घेत नसल्याने येथे काम करण्यास वन विभागाने मज्जाव केला आहे.

महामार्ग विभागाने आॅनलाइन प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने वन विभागाने हा प्रस्ताव परत पाठवला. त्यानंतर मात्र महामार्ग विभागाने पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत महाड प्रांत कार्यालय देखील गंभीर भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर मूळ जमीन मालक शेतकºयांची नावे आहेत, मात्र १९८० च्या वन संरक्षण अधिनियमानुसार सात बारा उताºयावर वन विभागाची नोंद झाली आहे. यामुळे या शेतकºयांना अद्याप महामार्ग विभागाचा मोबदला देखील मिळालेला नाही. दासगाव ते वीर दरम्यान असलेल्या वृक्षांचे मूल्यांकन देखील अद्याप झालेले नाही. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वन विभागाच्या नागपूर आणि भोपाळ येथील कार्यालयांना हे प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव त्रुटींविरहित पाठवला तर तत्काळ मान्य होणार आहे. मात्र वन विभाग, महामार्ग विभाग, प्रांत कार्यालय एकमेकाकडे चेंडू फेकून विलंब करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.मोबदला वाटप प्रक्रिया रखडलीच्खासगी मालकीच्या जमिनींच्या सातबारा उताºयावर मूळ शेतकरी आणि वन विभागाचा उल्लेख झाला आहे. यामुळे येथील संपादन, मूल्यांकन आणि मोबदला वाटप प्रक्रि या रखडली आहे. भारतीय वन संरक्षण अधिनियम १९२७ आणि त्यामध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या बदलाप्रमाणे वन संरक्षण अधिनियम १९८० नुसार ही नोंद झाली आहे.

च्या जमिनी शासनाने वृक्ष लागवड आणि संरक्षण या उद्देशाकरिता राखून ठेवल्या आहेत. कलम ३५ खाली या जमिनीवर कोणतेच बांधकाम करता येत नाही. महामार्ग बांधकाम विभागाने याबाबत कार्यवाही सुरू असतानाच पावले उचलणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने ही समस्या उद्भवली. काही जमिनींची कलम ६ नुसार चौकशी करून प्रश्न सोडवणे शक्य आहे, मात्र उपविभागीय कार्यालय ठोस कार्यवाही करत नसल्याचे दिसून येते.महामार्ग बांधकाम विभाग, महसूल आणि वन विभागाची एकत्रित बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी,महाडमहामार्ग विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र यामध्ये कायम त्रुटी काढली जात आहे. त्रुटी काढून पुन्हा प्रस्ताव पाठवला आहे.- प्रकाश गायकवाड, उपअभियंता,महामार्ग विभागमहामार्ग बांधकाम विभागाने प्रस्ताव त्रुटीविरहित पाठवणे आवश्यक आहे. चौपदरीकरण कामात येत असलेल्या वन विभागाच्या जमिनीतील झाडांचे मूल्यांकन केले जाईल.- राकेश सेपट, उपवनसंरक्षक, रोहा

टॅग्स :Raigadरायगड