शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दासगाव-वीर दरम्यान रखडले महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 02:33 IST

वन विभागाच्या जमिनीचा अडथळा : प्रस्ताव पाठवला परत

सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू असले तरी दासगाव आणि वीर दरम्यान असलेल्या वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीमुळे या पट्ट्यातील काम रखडले आहे. वन विभागाने येथील काम करण्यास सपशेल नकार दिला आहे. महामार्ग विभागाने पाठवलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव वन विभागाने परत पाठवला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यास प्रांत कार्यालय आणि महामार्ग विभाग टाळाटाळ करत आहेत.

मुंबई- गोवा महामार्ग क्र मांक ६६ चे चौपदरीकरण सध्या सुरू आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यान आणि कशेडी ते पुढे हे काम प्रगतिपथावर सुरू आहे. महाड तालुक्यातील दासगाव आणि वीर या दोन गावांच्या दरम्यान वन विभागाच्या जमिनी आहेत. यामुळे केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय येथे काम करता येणे शक्य नाही. दासगाव आणि वीर दरम्यान जवळपास २० हेक्टर परिसरातील वन विभागाच्या मालकीची ४२ गुंठे जमीन तर इतर खाजगी वन जमिनींचा समावेश आहे. दासगावमधील १० सातबारा तर वीरमधील ९ सातबारा वन विभागाच्या नोंदी असलेले आहेत. यामुळे येथे पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र महामार्ग विभाग आणि प्रांत कार्यालय हा विषय गंभीरपणे घेत नसल्याने येथे काम करण्यास वन विभागाने मज्जाव केला आहे.

महामार्ग विभागाने आॅनलाइन प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने वन विभागाने हा प्रस्ताव परत पाठवला. त्यानंतर मात्र महामार्ग विभागाने पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत महाड प्रांत कार्यालय देखील गंभीर भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर मूळ जमीन मालक शेतकºयांची नावे आहेत, मात्र १९८० च्या वन संरक्षण अधिनियमानुसार सात बारा उताºयावर वन विभागाची नोंद झाली आहे. यामुळे या शेतकºयांना अद्याप महामार्ग विभागाचा मोबदला देखील मिळालेला नाही. दासगाव ते वीर दरम्यान असलेल्या वृक्षांचे मूल्यांकन देखील अद्याप झालेले नाही. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वन विभागाच्या नागपूर आणि भोपाळ येथील कार्यालयांना हे प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव त्रुटींविरहित पाठवला तर तत्काळ मान्य होणार आहे. मात्र वन विभाग, महामार्ग विभाग, प्रांत कार्यालय एकमेकाकडे चेंडू फेकून विलंब करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.मोबदला वाटप प्रक्रिया रखडलीच्खासगी मालकीच्या जमिनींच्या सातबारा उताºयावर मूळ शेतकरी आणि वन विभागाचा उल्लेख झाला आहे. यामुळे येथील संपादन, मूल्यांकन आणि मोबदला वाटप प्रक्रि या रखडली आहे. भारतीय वन संरक्षण अधिनियम १९२७ आणि त्यामध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या बदलाप्रमाणे वन संरक्षण अधिनियम १९८० नुसार ही नोंद झाली आहे.

च्या जमिनी शासनाने वृक्ष लागवड आणि संरक्षण या उद्देशाकरिता राखून ठेवल्या आहेत. कलम ३५ खाली या जमिनीवर कोणतेच बांधकाम करता येत नाही. महामार्ग बांधकाम विभागाने याबाबत कार्यवाही सुरू असतानाच पावले उचलणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने ही समस्या उद्भवली. काही जमिनींची कलम ६ नुसार चौकशी करून प्रश्न सोडवणे शक्य आहे, मात्र उपविभागीय कार्यालय ठोस कार्यवाही करत नसल्याचे दिसून येते.महामार्ग बांधकाम विभाग, महसूल आणि वन विभागाची एकत्रित बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी,महाडमहामार्ग विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र यामध्ये कायम त्रुटी काढली जात आहे. त्रुटी काढून पुन्हा प्रस्ताव पाठवला आहे.- प्रकाश गायकवाड, उपअभियंता,महामार्ग विभागमहामार्ग बांधकाम विभागाने प्रस्ताव त्रुटीविरहित पाठवणे आवश्यक आहे. चौपदरीकरण कामात येत असलेल्या वन विभागाच्या जमिनीतील झाडांचे मूल्यांकन केले जाईल.- राकेश सेपट, उपवनसंरक्षक, रोहा

टॅग्स :Raigadरायगड