शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव भोईवाडा परिसरात दरडींची भीती कायम

By admin | Updated: October 6, 2016 03:38 IST

महाड महसूल प्रशासनाकडून पावसाच्या सुरूवातीपासूनच दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते.

सिकंदर अनवारे, दासगावमहाड महसूल प्रशासनाकडून पावसाच्या सुरूवातीपासूनच दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी ४ आॅक्टोबर रोजी महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा येथे घरापासून काही अंतरावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेला डोंगरावरील मोठा दगड येवून धडकल्याने कंबरेला मोठ्याप्रमाणात दुखापत झाली, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून २००५ मध्ये दासगावमध्ये दरड कोसळल्यानंतर महसूल विभागाकडून दरडग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी के ला असून प्रशासनावर नाराजी व्यक्त के ली आहे.२००५ मध्ये महाड तालुक्यातील काही गावांमध्ये दरडी कोसळून अनेक नागरिकांचे बळी गेले होते, तर अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा या विभागात एक भली मोठी दरड कोसळून अनेक घरे उद्ध्वस्त करत ४८ लोकांंना जीव गमवावा लागला होता. आजपर्यंत गेली ११ वर्षे परिसरातील नागरिक पावसाळा आला की दरड कोसळण्याच्या भीतीने आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. महसूल प्रशासन पावसाळ्यापूर्वी दरडी कोसळण्याच्या भीतीने येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटिसा देऊन जबाबदारी झटकत आहेत. भोईवाड्यामध्ये जवळपास ३०० घरे असून साधारण १५०० ते १७०० नागरिकांचे वास्तव्य करत आहेत. वारंवार दरडीचे प्रकार घडत आहेत. एकदा या विभागातील इब्राहिम टोळकर यांच्या घरावर मोठा दगड पडला. त्यात भारी नुकसानही झाले, या घटनेनंतर एक ा घरावर मातीचा ढिगारा येऊन अर्धे घर बंद झाले. सलग दोन तीन वर्षे बंदर रोडला लागून असणाऱ्या घरांवर दगड पडत आहेत तर यंदाच्या पावसाळ्यात दासगाव कॉम्रेड आर. बी. मोरे या हायस्कूलच्या मागील बाजूस एका वर्गावर मोठा दगड कोसळून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले, रात्रीच्या वेळी ही घटना झाल्याने विद्यार्थ्यांचे प्राण बचावले. मंगळवारी जागृती मिंडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली असता दरडीमुळे तिच्या अंगावर दगड कोसळून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वारंवार या घटना होऊन सुध्दा प्रशासनाकडून पंचनामाखेरीज सुरक्षिततेसाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. जर तशा प्रकारचे पाऊल उचलले गेले असते तर या महिलेचा जीव वाचला असता अशी संताप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. वेळीच जर नागरिकांच्या सूचनांकडे लक्ष दिले असते तर कदाचित महिलेचा मृत्यू झालाच नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. २००५ मध्ये दरडी कोसळून ज्या लोकांची घरे गेली त्यांनी अजूनही घर बांधण्यासाठी प्रशासनाकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. कुठली सोयही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील दरडग्रस्त ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरासाठी तात्पुरती निवारा शेड उभारण्यासाठी ९५ कोटी ८७ लाखांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता मात्र तोही अद्याप धूळखात पडला आहे. संरक्षण भिंत व डोंगर सपाट करण्याचा निष्कर्ष २००५ सालामध्ये दासगावमध्ये दरड कोसळल्यानंतर प्रशासनाकडून करण्यात आला. पावसाळ्यात नागरिकांना स्थलांतराशिवाय काही पर्याय नाही, मात्र याठिकाणच्या बऱ्याचशा नागरिकांनी ग्रामपंचायतीमार्फत दगड व माती थांबविण्यासाठी संरक्षण भिंत प्रशासनामार्फत करून मिळावी व डोंगर भाग सपाट करावा अशी मागणी वारंवार केली आहे, मात्र याकडे प्रशासन अद्यापही लक्ष न देता नोटिसांवरच समाधान मानत आहे.