शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:51 IST

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.कर्जत-मुरबाड हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून, दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच दिवसरात्र अवजड वजनाची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील कळंब गावाजवळ पोशीर नदीवरील पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलावरील निघालेल्या सळ्या टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन भरधाव वेगात असल्यास ते नदीतही पडू शकते. अशी दुर्घटना घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाययोजना कराव्यात. पुलाचे संरक्षण कठडेही कमकुवत झाले असून त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्यावर असलेल्या सळ्या उखडल्या आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहन उसळत असल्याने आरोग्याच्या व्याधीही उद्भवत असल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात कर्जत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल करपे यांच्याशी या कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नादुरुस्त रस्त्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोशीर नदीवरील पुलावर अनेक महिन्यांपासून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याआधी मार्गाची दुरु स्ती करावी. अन्यथा येथे अपघात घडल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल. - धनेश राणे, सामाजिक कार्यकर्ते.पोशीर नदीवरील मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळ्या टायरला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळ्या चुकवताना जोरदार अपघात होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरु स्ती होणे अवश्यक आहे.- मच्छींद्र मसणे, वाहनचालक.