शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:51 IST

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.कर्जत-मुरबाड हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून, दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच दिवसरात्र अवजड वजनाची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील कळंब गावाजवळ पोशीर नदीवरील पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलावरील निघालेल्या सळ्या टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन भरधाव वेगात असल्यास ते नदीतही पडू शकते. अशी दुर्घटना घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाययोजना कराव्यात. पुलाचे संरक्षण कठडेही कमकुवत झाले असून त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्यावर असलेल्या सळ्या उखडल्या आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहन उसळत असल्याने आरोग्याच्या व्याधीही उद्भवत असल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात कर्जत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल करपे यांच्याशी या कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नादुरुस्त रस्त्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोशीर नदीवरील पुलावर अनेक महिन्यांपासून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याआधी मार्गाची दुरु स्ती करावी. अन्यथा येथे अपघात घडल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल. - धनेश राणे, सामाजिक कार्यकर्ते.पोशीर नदीवरील मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळ्या टायरला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळ्या चुकवताना जोरदार अपघात होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरु स्ती होणे अवश्यक आहे.- मच्छींद्र मसणे, वाहनचालक.