शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्नाळ्याचे’ अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 00:14 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही

वैभव गायकर पनवेलऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही. कर्नाळा किल्ल्यावरील सुळक्याला सध्या चिरा पडत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वातावरणाच्या बदलामुळे हे परिणाम होत आहेत. प्राचीनकाळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत होता. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले, याचा नेमका पुरावा नसला तरी यादवांनीच तो बांधला असल्याचे बोलले जाते. निजाम, मराठे, पोर्तुगीज या सर्वांच्या इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे. १८१८ पर्यंत क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके यांचे आजोबा कर्नाळ््याचे किल्लेदार होते. याच कर्नाळ््याच्या इतिहासामुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. वृक्षतोड, प्रदूषणामुळे याठिकाणचे प्राणी, पक्षी देखील हळूहळू नष्ट होत गेले तसेच विविध औषधी वनस्पती देखील याठिकाणाहून नामशेष झाल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यात ‘जैत रे जैत’सारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. यावेळी याठिकाणच्या सुळक्याला लिंगोबाची उपमा देण्यात आली होती. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक याठिकाणी गिर्यारोहण(टे्रकिंग)साठी येत असतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते तसेच तटबंदी देखील गायब होत चालली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी १२ पाण्याचे हौद व धान्याची कोठारे आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून योग्य उपाययोजना आजवर होताना दिसून आलेल्या नाहीत. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पक्षी अभयारण्यात पर्यटनप्रेमींपेक्षा संख्या दिवसेंदिवस वाढत आह. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व पाहता याठिकाणच्या बुरुजाच्या संवर्धनासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत यासाठी मी शासनाच्या संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गडकिल्ले अभ्यासक विजय खिल्लारे यांनी सांगितले.