शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

‘कर्नाळ्याचे’ अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 00:14 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही

वैभव गायकर पनवेलऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही. कर्नाळा किल्ल्यावरील सुळक्याला सध्या चिरा पडत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वातावरणाच्या बदलामुळे हे परिणाम होत आहेत. प्राचीनकाळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत होता. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले, याचा नेमका पुरावा नसला तरी यादवांनीच तो बांधला असल्याचे बोलले जाते. निजाम, मराठे, पोर्तुगीज या सर्वांच्या इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे. १८१८ पर्यंत क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके यांचे आजोबा कर्नाळ््याचे किल्लेदार होते. याच कर्नाळ््याच्या इतिहासामुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. वृक्षतोड, प्रदूषणामुळे याठिकाणचे प्राणी, पक्षी देखील हळूहळू नष्ट होत गेले तसेच विविध औषधी वनस्पती देखील याठिकाणाहून नामशेष झाल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यात ‘जैत रे जैत’सारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. यावेळी याठिकाणच्या सुळक्याला लिंगोबाची उपमा देण्यात आली होती. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक याठिकाणी गिर्यारोहण(टे्रकिंग)साठी येत असतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते तसेच तटबंदी देखील गायब होत चालली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी १२ पाण्याचे हौद व धान्याची कोठारे आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून योग्य उपाययोजना आजवर होताना दिसून आलेल्या नाहीत. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पक्षी अभयारण्यात पर्यटनप्रेमींपेक्षा संख्या दिवसेंदिवस वाढत आह. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व पाहता याठिकाणच्या बुरुजाच्या संवर्धनासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत यासाठी मी शासनाच्या संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गडकिल्ले अभ्यासक विजय खिल्लारे यांनी सांगितले.