शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:44 IST

पोलादपूरमध्ये वीटभट्टी व्यवसाय धोक्यात 

लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आपले रूप दाखवत नुकतीच पेरणी केलेली भुईमुग, चवळी, मिरची, टॉमेटोची रोपे आडवी करून टाकली आहे. तर नुकताच आलेला आंब्याचा मोहोर गळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत सापडला आहेत. काही ठिकाणी घरदुरुस्ती सुरू असल्याने तारांबळ उडाली.ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तर काही ठिकाणी शेतात पिके आडवी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच कापणी केलेले भात पेंढे भिजून गेले आहेत. एकीकडे कोरोनाशी लढताना पावसाशी सामना करावा लागत आहे, त्यातच आर्थिक मंदी असल्याने विविध साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.तालुक्यातील तुर्भे लोहारमाळ, वाकण, भोगाव, कोतवाल, ढवली, कामथी, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला पावसाचा फटका बसला आहे, तर महामार्गावर काम चालू असल्याने अचानक आलेल्या पावसाने चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जागोजागी खड्डे पडल्याने कंबर मोड प्रवास करावा लागत आहे.