शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे नुकसान : माणगावमध्ये ४४१२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:56 IST

पावसामुळे नुकसान : बळीराजा सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत

माणगाव : अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबतचे माणगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती तहसीलदार माणगाव व कृषिविभागाकडून दिली आहे. तालुक्यातील बाधित एकूण संख्या १८७ आहे तर पंचनामे झालेली पूर्ण गावसंख्या १६७ आहे. एकूण पिकाखालील क्षेत्र १२२५० हेक्टर असून हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी संख्या ४४१२ व एकूण क्षेत्र १३५०.०६ हेक्टर असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी कापणी पश्चात पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या २७४ व ८७.५० हेक्टर क्षेत्र तसेच उभ्या पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या ४१३८ व एकूण क्षेत्र ११४२.५६ हेक्टर आहे. पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी विमा संरक्षित संख्या २१ व त्यांचे क्षेत्र ४.२० हेक्टर आहे. तसेच १६७ गावे व उर्वरित गावांचे पंचनामे प्रगतीपथावर असून बाधित क्षेत्र व खातेदार संख्या वाढणार अशी माहिती देण्यात आली.तालुक्यातील बहुतांश सर्व शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. यावर त्यांच्या कु टुंबाचा उदरनिवाह होतो; मात्र परती पाऊस आणि क्यार, महा या सारख्या चक्रीवादळामुळे होणार अवकाळी पाऊस यामुळे कापणीला आलेले भात पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकºयाची महेनतच पाण्यात गेली आहे. शासनाने महसूल विभागाकडून पंचनामेची कामे प्रगती पथावर चालू असून यावेळी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे व तालुका कृषि अधिकारी पी.बी. नवले यांनी भादाव गावात जाऊन संयुक्त पाहणी केली.तालुका कृषि अधिकाºयांनी शेतकºयांनी सध्या शेतीच्या अंगवलीवरती हरभरा , मूग , मटकी , चवळी , पावटा, वाल अशा द्विदल धान्याची लागवड करावी. सध्याची शेतीची जागा उशिरा राहिलेल्या पावसाने ओली रहाणार आहे कडधान्य शेतकºयाने पेरल्यास चांगले पीक घेता येईल असे सांगितले.मुरूडच्या ११७० हेक्टरला फटका1आगरदांडा : राज्यात आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी गेले चार दिवस स्व:त तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कुषिअधिकारी सुरज नामदास यांच्या समवेत तालुक्यातील प्रत्येक गावातील २९५६ शेतबांधावर ११७० हेक्टर शेतीची पाहणी करून पंचनामे के ले आहे. ८० लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले असून या शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे तहसीलदार गावीत यांनी सांगितले.2मुरुड तालुक्यात ४५०० मिलीमीटर एवढा पाऊस त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले होते. शेतात भाताच्या लोंबी तयार झाल्या होत्या परंतु अवकाळी पावसामुळे आलेले भात पीक शेत जमिनीत गाडले गेल्याने आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते.3भात पिकांबरोबरच सुपारी व इतर कडधान्य पिकांना सुद्धा अवकाळी पावसाने नुकसानीची झळ सोसावी लागली होती. याबाबत मुरुड तहसीलदारांनी यांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरू वात के ली आहे. मुरुड तालुक्यात काही शेतकºयांच्या ९ ते १० एकर क्षेत्राच्या मोठ्या भात पीक लागवडीच्या जमिनी असून अवकाळी पावसामुळे सर्वच गमावल्यामुळे आता शेतकºयांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड