शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसामुळे नुकसान : माणगावमध्ये ४४१२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:56 IST

पावसामुळे नुकसान : बळीराजा सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत

माणगाव : अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबतचे माणगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती तहसीलदार माणगाव व कृषिविभागाकडून दिली आहे. तालुक्यातील बाधित एकूण संख्या १८७ आहे तर पंचनामे झालेली पूर्ण गावसंख्या १६७ आहे. एकूण पिकाखालील क्षेत्र १२२५० हेक्टर असून हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी संख्या ४४१२ व एकूण क्षेत्र १३५०.०६ हेक्टर असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी कापणी पश्चात पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या २७४ व ८७.५० हेक्टर क्षेत्र तसेच उभ्या पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या ४१३८ व एकूण क्षेत्र ११४२.५६ हेक्टर आहे. पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी विमा संरक्षित संख्या २१ व त्यांचे क्षेत्र ४.२० हेक्टर आहे. तसेच १६७ गावे व उर्वरित गावांचे पंचनामे प्रगतीपथावर असून बाधित क्षेत्र व खातेदार संख्या वाढणार अशी माहिती देण्यात आली.तालुक्यातील बहुतांश सर्व शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. यावर त्यांच्या कु टुंबाचा उदरनिवाह होतो; मात्र परती पाऊस आणि क्यार, महा या सारख्या चक्रीवादळामुळे होणार अवकाळी पाऊस यामुळे कापणीला आलेले भात पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकºयाची महेनतच पाण्यात गेली आहे. शासनाने महसूल विभागाकडून पंचनामेची कामे प्रगती पथावर चालू असून यावेळी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे व तालुका कृषि अधिकारी पी.बी. नवले यांनी भादाव गावात जाऊन संयुक्त पाहणी केली.तालुका कृषि अधिकाºयांनी शेतकºयांनी सध्या शेतीच्या अंगवलीवरती हरभरा , मूग , मटकी , चवळी , पावटा, वाल अशा द्विदल धान्याची लागवड करावी. सध्याची शेतीची जागा उशिरा राहिलेल्या पावसाने ओली रहाणार आहे कडधान्य शेतकºयाने पेरल्यास चांगले पीक घेता येईल असे सांगितले.मुरूडच्या ११७० हेक्टरला फटका1आगरदांडा : राज्यात आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी गेले चार दिवस स्व:त तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कुषिअधिकारी सुरज नामदास यांच्या समवेत तालुक्यातील प्रत्येक गावातील २९५६ शेतबांधावर ११७० हेक्टर शेतीची पाहणी करून पंचनामे के ले आहे. ८० लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले असून या शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे तहसीलदार गावीत यांनी सांगितले.2मुरुड तालुक्यात ४५०० मिलीमीटर एवढा पाऊस त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले होते. शेतात भाताच्या लोंबी तयार झाल्या होत्या परंतु अवकाळी पावसामुळे आलेले भात पीक शेत जमिनीत गाडले गेल्याने आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते.3भात पिकांबरोबरच सुपारी व इतर कडधान्य पिकांना सुद्धा अवकाळी पावसाने नुकसानीची झळ सोसावी लागली होती. याबाबत मुरुड तहसीलदारांनी यांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरू वात के ली आहे. मुरुड तालुक्यात काही शेतकºयांच्या ९ ते १० एकर क्षेत्राच्या मोठ्या भात पीक लागवडीच्या जमिनी असून अवकाळी पावसामुळे सर्वच गमावल्यामुळे आता शेतकºयांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड